शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

अन्नाचे ताट बदलले तर पृथ्वीचे आरोग्य सुधारेल : प्रियंका पाटील

By अविनाश कोळी | Published: May 19, 2024 1:48 PM

सांगलीत ‘पुनरुत्पादक जीवनशैली’ विषयावर व्याख्यान

सांगली : पूर्वीच्या काळात अन्न औषधी होते. सध्याचा समाज अन्नाकडे उत्पादन म्हणूनच पाहतो. अन्नाचे आरोग्य बिघडल्यामुळे अनेक समस्यांचा जन्म झाला आहे. अन्नाचे ताट बदलले तर पृथ्वीचे आरोग्य सुधारेल, असे मत पुनरुत्पादक कृषी अभियानाच्या संशोधक प्रियंका पाटील यांनी व्यक्त केले.सांगलीतील लठ्ठे एज्युकेशन सोसायटी व अमेरिकेतील दिवाणबहाद्दूर लठ्ठे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांगलीत ‘पुनरुत्पादक जीवनशैली’ या विषयावर प्रियंका पाटील यांनी मार्गदर्शन व प्रोजेक्टरद्वारे सादरीकरण केले. त्या म्हणाल्या की, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, बेरोजगारी, भूकबळी अशा सर्व समस्यांचे मूळ अन्न प्रक्रियेत आहे. अनेक आजारांनी जसे माणसांना ग्रासले आहे, तसेच पर्यावरणालाही आजाराने जखडले आहे. आपल्या भोवतालचे हे प्रश्न संपवायचे असतील तर पुनरुत्पादक जीवनशैलीचा अंगीकार केला पाहिजे. त्यासाठी अन्नप्रक्रिया सुधारली पाहिजे. पूर्वीप्रमाणे अन्न औषधी बनायला हवे.

अन्नाबाबत आपण जागरुक नाही. जगातील उत्पादीत अन्नापैकी ६० टक्के अन्न वाया जाते. दुसरीकडे कोट्यवधी लोक अन्नापासून वंचित असतात. हा विरोधाभास दूर झाला पाहिजे. संशोधन करताना आम्हाला लक्षात आले की जगात सर्वाधिक नकारात्मक परिणाम हे अन्नावर झालेले आहेत. त्यामुळे अन्नप्रक्रियेवरील नकारात्मकता दूर करायला हवी. बियाणांच्या सक्षमीकरणातून त्याची सुरुवात केली पाहिजे. त्यासाठी आम्ही बीजमहोत्सवाची परंपरा सुरु केली आहे. पृथ्वीतलावरची जैवविविधता व सेंद्रियता टिकली पाहिजे. याकामी सर्वांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सोसायटीच्या व्यवस्थापकीय परिषदेचे अध्यक्ष शांतीनाथ कांते, मानद सचिव सुहास पाटील, भरत लठ्ठे, मौसमी चौगुले, उदय पाटील, प्रमोद चौगुले, गजानन माणगावे, डॉ. एस. व्ही. रानडे, सांगलीचे प्रा. एम. एस रजपूत आदी उपस्थित होते.