शहरं
Join us  
Trending Stories
1
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
2
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?
3
ही आहेत चार प्रभावशाली कुटुंब, ज्यांच्याकडे आहे तिरुपतीच्या पूजेची जबाबदारी, एवढं मिळतं मानधन, आहे कोट्यवधीची संपत्ती
4
Telegram सीईओ Pavel Durov दबावाला बळी पडले? IP Address, नंबर शेअर करणार!
5
तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त
6
“विरोधकांनी राजकारण करायची गरज नाही”; अक्षय शिंदे एन्काउंटरवर रामदास आठवले थेट बोलले
7
Akshay Kumar : "आवाज केला असता तर गोळ्या घातल्या असत्या"; अक्षय कुमारने सांगितला चंबळचा थरारक अनुभव
8
रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत; कंगना राणौतची मोठी मागणी
9
T20 World Cup 2024 : 'स्वप्न'पूर्तीसाठी टीम इंडिया सज्ज! 'मन' खूप झालं आता 'जग' जिंकण्यासाठी हरमन है तय्यार
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ठरणार भवितव्य
11
शेअर बाजारावर बॉट्सचा ताबा, FII ट्रेडर्सनं अल्गोरिदममध्ये फेरफार केला; ५९००० कोटींची कमाई : SEBI
12
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार
13
"मी शरद पवारांना दैवत मानत आलोय", अजित पवार सुप्रिया सुळेंवर का भडकले?
14
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
15
पाकिस्तान क्रिकेटला लवकरच 'अच्छे दिन'! कोच कर्स्टन यांना विश्वास; खेळाडूंसमोर ठेवल्या ३ अटी
16
KL राहुल मर्जीतला; टीम इंडियात सुरुये Sarfaraz Khan ला रिलीज करण्याचा विचार
17
Monkeypox : टेन्शन वाढलं! ज्याची भीती होती तेच घडलं; भारतात पोहोचला मंकीपॉक्सचा खतरनाक व्हेरिएंट
18
IND vs BAN: "...तर अश्विनला आधीच निवृत्ती घ्यायला लावली असती"; माँटी पानेसारचे मत
19
Munawar Faruqui buys Flat in Mumbai: मुनव्वर फारुकीने मुंबईत खरेदी केला कोट्यवधींचा फ्लॅट, कुठून होते इतकी कमाई?
20
नवीन मोबाईलची खरेदी अन् आयुष्याचा शेवट! मित्रांनीच केला घात, पार्टी न दिल्याने तरुणाची हत्या

सीएम टू पीएम’ आसूड यात्रा ११ एप्रिलपासून

By admin | Published: March 24, 2017 12:25 AM

शेतकरी संघटनेचा निर्धार : इस्लामपुरात शहीद अभिवादन मेळावा; देशभरात संघटित लढा उभारणार

‘इस्लामपूर : स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि पूर्ण कर्जमुक्ती या दोन प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या मान्य करुन घेण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांचा संघटित लढा उभारण्याचा एल्गार विविध राज्यांतील शेतकऱ्यांनी, नेत्यांनी येथे पुकारला. ११ ते २१ एप्रिलदरम्यान ‘सीएम टू पीएम’ अशी आसूड यात्रा नागपूर ते दिल्लीपर्यंत काढण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सबका विकास आणि शेतकऱ्यांचा सत्यानाश’ असे धोरण असल्याची टीका यावेळी वक्त्यांनी केली.येथील राजारामबापू नाट्यगृहात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या पुढाकाराने हुतात्मा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू व रामचंद्र ऊर्फ आप्पा पाटील यांच्या स्मृतिदिनी शहीद अभिवादन मेळावा झाला. यापूर्वी शेतकरी नेत्यांची मिरवणूक काढण्यात आली. या मेळाव्यासाठी ‘प्रहार’चे संस्थापक आमदार बच्चू कडू, भारतीय किसान मंचचे अध्यक्ष सतनामसिंग बेरु (पंजाब), राजकुमार (तामिळनाडू), रवी दत्त, भागवत पांडे (मध्य प्रदेश), शांताकुमार (कर्नाटक), नितीन चौधरी (नागपूर), कालिदास आपेट, शिवाजी नांदखिले, महिला आघाडीच्या वंदनाताई माळी, शबाना मुल्ला, दिनकर दाभाडे उपस्थित होते.यावेळी आ. बच्चू कडू म्हणाले की, देशात सध्या जातीधर्माच्या नावाखाली राजकारण करुन बहुजनांची डोकी भडकवली जात आहेत. शेतकऱ्यांच्या ३0 हजार कोटींच्या कर्जमाफीसाठी राज्यकर्ते दिल्लीवाऱ्या करतात, यातच शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांनी ताकदीने संघटित होऊन संघर्ष करायला हवा. ११ ते २१ एप्रिलदरम्यान आसूड यात्रा काढून पंतप्रधान मोदींना त्यांनी दिलेल्या आश्वासनांची जाणीव करुन देणार आहोत.रघुनाथदादा पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांच्या जिवावर उठणाऱ्या या राज्यकर्त्यांबरोबर कधीही जाणार नाही. स्वाभिमानी, बळीराजा, महाप्रतापी बळीराजा या संघटना चळवळीत काम करायच्या लायकीच्या नाहीत. ज्यांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या, त्यांच्या जवळ बसत या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीत खंजिर खुपसला आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि कर्जमुक्ती या दोन मागण्या पूर्ण करून घेऊच.मध्य प्रदेशचे रवीदत्त म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सन्मानाची लढाई पूर्ण देशभरात ताकदीने लढणार आहोत. शांताकुमार म्हणाले की, सरकार चार टक्के कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगापोटी १ लाख ४ हजार कोटी रुपये दर महिन्याला देते. मात्र ७0 टक्के शेतकऱ्यांना द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत. कन्हैयालाल सिन्हा म्हणाले की, देशातील शहिदांच्या परिवाराप्रती आजही न्याय केला जात नाही. सीमेवर शहीद होणारी शेतकऱ्यांचीच मुले आहेत. मोदी किसानविरोधी आहेत. कालिदास आपेट यांनी प्रास्ताविक केले. हणमंत पाटील यांनी आभार मानले. रामजीवन बोंदूर, बाळासाहेब पठारे, शंकर गायकवाड, आनंद भालेकर, इकबाल जमादार, एल. के. पाटील, शंकर मोहिते, जगन्नाथ चिप्रीकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)