शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

सांगलीतील चार लाखांवर लाभार्थ्यांचा शिधाचा ‘आनंद’ हरवला, शासनाने गुपचुपच योजना बंद केली की काय?

By अशोक डोंबाळे | Updated: April 15, 2025 17:27 IST

गौरी-गणपतीपासून लाभच नसल्यामुळे रेशनकार्डधारक चिंतेत

अशोक डोंबाळे

सांगली : राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सणासुदीच्या काळात लाभार्थ्यांचे तोंड गोड व्हावे, या उद्देशाने १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देण्याची योजना सुरू केली होती. त्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना साडीवाटप केले. परंतु, जिल्ह्यातील चार लाख १२ हजार २८३ लाभार्थ्यांना गौरी-गणपतीपासून आनंदाच्या शिधाचे वाटपच झालेले नाही. त्यामुळे ही योजना सरकारने गुंडाळली की काय? अशी शंका लाभार्थी उपस्थित करत आहेत.जिल्ह्यातील चार लाख १२ हजार २८३ रेशनकार्डधारक कुटुंबांना आनंदाचा शिधा देण्यात आला होता. कोविडपासून मोफत धान्य दिले जाते. महायुतीचे सरकार आल्यानंतर शंभर रुपयांत आनंदाचा शिधा ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत शिधा संचात एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर, एक लिटर पामतेल देण्यात येत होते. त्यामुळे सणासुदीच्या काळात अवघ्या १०० रुपयांत गोरगरिबांच्या घरी गोडधोड बनत होते.परंतु, लाडकी बहीण योजना अमलात आल्यानंतर राज्याच्या तिजोरीवरील ताण वाढतच चालला आहे. त्यामुळे अनेक योजनांचा निधी तिकडे वळवला आहे. त्याचा फटका आता शिधापत्रिकाधारकांनाही बसत असल्याचे दिसून येत आहे. त्यात गौरी-गणपतीपासून आनंदाचा शिधा रेशन दुकानावर आलाच नाही. त्यात काही दिवसांपूर्वीच झालेल्या गुढीपाडवा सणानिमित्त शासनाने फक्त अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यातही अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे साडीवाटप करण्यात आले नाही.१४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यामुळे आनंदाचा शिधा मिळेल, अशी लाभार्थ्यांना अपेक्षा होती. परंतु, अद्यापही रेशन दुकानांवर आनंदाचा शिधा पोहोचलेलाच नाही. त्यामुळे शासनाने ‘आनंदाचा शिधा’ ही योजना गुंडाळली की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

जिल्ह्यातील आनंदाचा शिधाचे पात्र लाभार्थीतालुका - रेशनकार्डधारकमिरज - १०१५८७क. महांकाळ - २४०७२जत - ५२९४२आटपाडी - २३१८०कडेगाव - २५५४०खानापूर - २७५८८तासगाव - ४२१७२पलूस - २८१२६वाळवा - ६०७००शिराळा - २६३७६एकूण - ४१२२८३

शासनाकडून आदेश नाहीतआनंदाचा शिधा हा गौरी-गणपतीवेळी आला होता. हाच शिधा पुढील काही दिवस वाटप करण्यात आला होता. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा अद्याप आलेला नाही. त्याबाबत शासनाचे आदेशही नाहीत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकार