शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
2
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
3
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
4
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
5
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
6
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
7
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
8
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
9
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
10
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
11
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
12
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
13
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
14
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
15
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
16
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव
17
अजित पवार गट पदाधिकारी हत्या प्रकरणात तिघांना अटक; राजकीय वैमनस्यातून काढला काटा
18
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
19
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
20
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी

आपसातील संघर्षाने सत्तेचा गोंधळ

By admin | Published: March 08, 2016 12:04 AM

महापालिकेत यादवी : मदनभाऊ गटाला शह देण्याच्या हालचाली

सांगली : महापालिकेच्या राजकारणात आतापर्यंत सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा संघर्ष सांगलीकरांनी अनुभवला असेल. पण आता सत्ताधारी काँग्रेसमधीलच दोन गटात यादवीची शक्यता आहे. पालिकेत काँग्रेसची सत्ता असली तरी, सत्ताधारी मदनभाऊ पाटील यांचा गट आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या एका गटाने स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्याबरोबरच पाटील गटाला शह देण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात काँग्रेस विरूद्ध काँग्रेस असा सामना रंगला, तर नवल नाही. मदनभाऊ पाटील यांच्या निधनानंतर पालिकेतील सत्ताधारी काँग्रेसच्या चिंधड्या उडाल्या आहेत. त्याचा प्रत्यय महापौर, उपमहापौर निवडीवेळी आला. अगदी मदनभाऊ यांच्याशी एकनिष्ठ म्हणून मिरविणाऱ्या नगरसेवकांनीही त्यांच्या पश्चात बंडाचे निशाण हाती घेतले. शिवाय मदनभाऊंनी ज्यांना प्रतिष्ठा दिली, पदे दिली, ती मंडळीही आता त्यांच्याविरोधात गटा-तटाचे राजकारण करू लागली आहेत.या साऱ्यावर मात करीत मदनभाऊ गटाने महापौर निवडीत बाजी मारली. मदनभाऊंच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांच्यावर निष्ठा असलेल्या नगरसेवकांची संख्या आजही अधिक आहे. त्यात हा गट एकसंधपणे साऱ्या आव्हानांना सामोरा जात आहे. जयश्रीताई पाटील यांच्या शब्दाखातरच हारूण शिकलगार यांची महापौरपदी निवड झाली, हेही नाकारून चालणार नाही. उपमहापौरांची निवड होताना मात्र बरेच राजकारण घडले. महापौर, उपमहापौरांची निवड होऊन महिन्याचा कालावधी लोटला नाही तोपर्यंतच अंतर्गत धुसफूस वाढली आहे. उपमहापौरांनी स्वतंत्र बैठका घेऊन सवतासुभा मांडला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर पालिकेच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सध्या महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती व गटनेता अशी चार संस्थाने पालिकेत आहेत. त्यापैकी महापौर व स्थायी समिती सभापती हे मदनभाऊ गटाचे मानले जातात. उपमहापौर विजय घाडगे हे माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील गटाचे आहेत. वर्षभरापूर्वी माजी महापौर विवेक कांबळे व स्थायी समितीचे माजी सभापती संजय मेेंढे यांच्यात संघर्ष उफाळला होता. आताही तशीच परिस्थिती आहे. केवळ पदाधिकारी बदलले आहेत. भविष्यात महापौर, स्थायी समिती सभापती विरुद्ध उपमहापौर असा संघर्ष सुरू झाल्यास नवल वाटू नये. हा संघर्ष केवळ महापालिकेपुरताच मर्यादित राहणार नाही. (प्रतिनिधी)जयश्रीतार्इंची कोंडीमहापालिकेच्या राजकारणात नवख्या असलेल्या जयश्रीताई मदन पाटील यांची राजकीय कोंडी करण्याच्या हालचाली काँग्रेसमधून सुरू आहेत. पण जयश्रीतार्इंच्या पाठीशी मदनभाऊनिष्ठ कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे. काही नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांना राजकीयदृष्ट्या लक्ष्य बनविण्याचा डाव आखला जात आहे. त्यामुळे भविष्यात सत्ताधारी गटावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू शकतात.