शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
2
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
3
जीवघेणं 'टायमिंग'! पतीशी भेट शेवटची ठरली; 'त्या' गोड बातमीचा आनंद अपघाताने हिरावला
4
"ओवेसींच्या पायजम्याची साइज टिंगूपेक्षा मोठी’’, इम्तियाज जलील यांची नितेश राणेंवर टीका  
5
मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती
6
IND vs BAN 2nd Test; India's Probable Playing XI : लोकेश राहुलसह बुमराह 'आउट'; या दोघांना मिळू शकते संधी
7
१११ वर्षांनी पितृपक्षात शुभ योग: ६ राशींना सर्वोत्तम, लाभच लाभ; नशिबाची साथ, भाग्याचा काळ!
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
9
पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत
10
MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश: कृषी सेवेतील पदांचा समावेश करत पूर्व परीक्षेची नवी तारीख आयोगाकडून जाहीर
11
MobiKwik IPO: ₹७००००००००० उभारण्याची तयारी; मोबिक्विकच्या आयपीओला सेबीचा हिरवा झेंडा
12
थरकाप उडवणारं हत्याकांड! कोण होती महालक्ष्मी?, जिचं मुंडकं फ्रीजमध्ये सापडलं
13
Success Story: पुण्यात जन्म, भारतात यश मिळालं नाही; अमेरिकेची वाट धरली, आता आहेत ६४,३२५ कोटींचे मालक
14
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
15
प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी
16
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
17
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
18
अधिकाऱ्यांच्या असहकारावरून मुनगंटीवार ‘कॅबिनेट’मध्ये भडकले
19
राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर; धान उत्पादकांना चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर
20
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची वाताहत

By admin | Published: January 23, 2016 1:14 AM

वाळवा-शिराळ्यातील चित्र : खमक्या नेतृत्वाची पक्षाला आवश्यकता

अशोक पाटील -- इस्लामपूर वाळवा-शिराळा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. शिराळ्यात माजी सभापती शिवाजीराव देशमुख, सत्यजित देशमुख यांनी काँग्रेस जिवंत ठेवली आहे, तर वाळवा तालुक्यात सत्तेसाठी काँग्रेस, अन्यथा आम्ही त्या पक्षाचेच नाही, असा पवित्रा घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची वाताहत होत चालली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. मात्र आगामी निवडणुका आघाडी करून लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा प्रत्ययही नुकत्याच कोल्हापुरात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीवेळी आला.शिराळा मतदारसंघात माजी सभापती शिवाजीराव देशमुख, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक एकत्र असताना राष्ट्रवादीची डाळ शिजली नाही. परंतु यांच्यामध्ये फूट पडल्याने २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत मानसिंगराव नाईक आमदार झाले, तर नंतरच्या निवडणुकीत भाजपमध्ये गेलेले शिवाजीराव नाईक आमदार झाले. यामुळे दहा वर्षापासून शिराळ्यात काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. आता सत्यजित देशमुख यांनी मानसिंगराव नाईक यांच्याशी मिळते-जुळते घेतले आहे.वाळवा तालुक्यात काँग्रेसचे नेतृत्व करणारे नानासाहेब महाडिक यांची भूमिका नेहमीच संदिग्ध राहिली आहे. त्यामुळे काही काँग्रेस नेते त्यांच्यापासून लांब राहणे पसंत करतात. तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्याकडून पक्षवाढीसाठी निर्णय घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते दुरावले आहेत. बोरगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य व कृष्णा कारखान्याचे संचालक जितेंद्र पाटील यांनी परिसरापुरती काँग्रेस जिवंत ठेवली आहे. परंतु ही ताकद तालुक्यात चालत नाही. दादासाहेब पाटील, प्रतापराव मोरे, आर. आर. पाटील, नजीर वलांडकर, जयकर कदम नावालाच पक्षात आहेत.इस्लामपूरचे माजी नगरसेवक वैभव पवार, त्यांचे बंधू विजय पवार काँग्रेसमध्ये असले तरी, अस्तित्व टिकवण्यासाठी ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याशी संधान साधून आहेत. कामेरीचे सी. बी. पाटील शांत असून, त्यांचे चिरंजीव जयराज पाटील युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, सत्यजित देशमुख यांचे नेतृत्व मानून युवा काँग्रेसची धुरा सांभाळत आहेत.वाळवा तालुक्यात काँग्रेस पक्ष एक असला तरी, नेते मात्र अनेक झाले आहेत. त्यामुळे पक्षाची वाताहत होत चालली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेऊन वाळवा तालुक्यातील काँग्रेसमध्ये पडलेले गट एकत्रित करण्याचा प्रयत्न करू. कार्यकारिणी बदलाबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. आगामी काळात युवकांना संधी देऊ.- बाळासाहेब पाटील, वाळवा तालुकाध्यक्ष, काँग्रेस.