शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महाजनादेश यात्रेकरिता महावितरणचे ग्राहक वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:04 IST

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची महाजनादेश यात्रा राज्यभर सुरू असून, तिचे आगमन सोमवारी सांगलीत झाले. वाहनांच्या ...

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची महाजनादेश यात्रा राज्यभर सुरू असून, तिचे आगमन सोमवारी सांगलीत झाले. वाहनांच्या ताफ्यातील रथाच्या उंचीमुळे अडथळा नको म्हणून महावितरण कंपनीने रस्त्यावरील विद्युत तारा तोडल्यामुळे पलूस तालुक्यातील बांबवडे, येळावीतील नागरिकांना अंधारात रहावे लागले. सांगली शहरातही काही भागात सोमवारी रात्री नऊपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. लोकांना वेठीस धरल्याने संतप्त प्रतिक्रिया आहेत. अनेक झाडांची कत्तलही करण्यात आली.सांगलीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या यात्रेतील वाहनाला अडथळा नको म्हणून सुरक्षेसाठी विजेच्या तारा तोडल्याने त्याचा बोजा ग्राहकांवर बसणार आहे. मात्र वीज जोडणीचा फारसा खर्च नसल्याचा दावा महावितरणचे अधिकारी करीत आहेत. प्रत्यक्षात पलूस ते पाचवा मैल या रस्त्यावरील बारा ते तेरा ठिकाणच्या तारा तोडल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे अनेक कुटुंबांना अंधारातच स्वागत करावे लागले. उंच वाहनांना अडथळा नको म्हणून अनेक ठिकाणच्या विद्युत तारा तोडून त्याचा लाखो रुपयांचा खर्च ग्राहकांवर का?, असा सवाल उपस्थित होत आहे.पलूस तालुक्यातील बांबवडे आणि तासगाव तालुक्यातील येळावी गावातील अनेक कुटुंबीयांच्या घरात दोन दिवस अंधार होता. राज्य सरकारने रॉकेल देणेही बंद केल्यामुळे तेथील कुटुंबीयांचे प्रचंड हाल झाले. याला जबाबदार कोण, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष महावीर पाटील यांनी उपस्थित केला आहे. ग्रामीण भागाबरोबरच मिरज ते सांगली, आंबेडकर रस्ता ते कोल्हापूर रस्त्यावरील अनेक ठिकाणच्या विद्युत तारा तोडाव्या लागल्या आहेत. महाजनादेश यात्रा गेल्यानंतरही अनेक ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत झाला नसल्यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त केला.महाजनादेश यात्रेमुळे जनता अंधारात : संतोष पाटीलमुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसाठी सांगली-मिरजेतील वृक्षांची कत्तल करण्यात आली. त्याचबरोबर यात्रेच्या मार्गावरील विद्युतपुरवठाही खंडित करण्यात आला. यात्रा संपल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत कॉलेज कॉर्नर, उत्तर शिवाजीनगर, काँग्रेस कमिटी, पुष्पराज चौक, कोल्हापूर रोड परिसर अंधारात होता. महाजनादेश यात्रेमुळे जनतेत आनंदाचे वातावरण अपेक्षित होते. पण या यात्रेने सांगलीकरांना अंधारात ढकलल्याची टीका मदनभाऊ युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक संतोष पाटील यांनी केली.