शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

जिल्ह्यात ११२६ जणांना कोरोना; १५८९ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 4:26 AM

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील स्थिरता कायम राहिली आहे. रविवारी दिवसभरात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचेही प्रमाण वाढले असून ११२६ जणांना ...

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील स्थिरता कायम राहिली आहे. रविवारी दिवसभरात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचेही प्रमाण वाढले असून ११२६ जणांना निदान झाले, तर १५८९ जण कोरोनामु्क्त झाले आहेत. परजिल्ह्यातील ५ जणांसह जिल्ह्यातील २४ जणांचा मृत्यू झाला आहे. वाळवा तालुक्यात सर्वाधिक २०९ रुग्णांची नोंद झाली आहे.

आठवडाभरापासून रुग्णांची संख्या स्थिर असून त्यात रविवारी पुन्हा घट झाली. शिवाय बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील २४ जणांचा मृत्यू झाला असून त्यात वाळवा तालुक्यातील ६, खानापूर, जत, मिरज तालुक्यातील प्रत्येकी ४, तासगाव २, तर आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ आणि पलूस तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. दीड महिन्यानंतर प्रथमच महापालिका क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद न झाल्याने दिलासा मिळाला आहे.

आरोग्य विभागाने रविवारी आरटीपीआरअंतर्गत २५०९ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ५७० जण बाधित आढळले आहेत, तर रॅपिड ॲन्टिजनच्या २७३८ जणांच्या तपासणीतून ६२४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

विविध रुग्णालयांसह होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या १३ हजार ३८० रुग्णांपैकी २२३० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात १९२८ जण ऑक्सिजनवर, तर ३०१ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील ५ जणांचा मृत्यू झाला असून नवे ६८ रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १०९४२४

उपचार घेत असलेले १३३८०

कोरोनामुक्त झालेले ९२८७२

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३१७२

रविवारी दिवसभरात...

सांगली ९९

मिरज ६८

वाळवा २०९

जत १४८

मिरज तालुका १२०

शिराळा ९८

कडेगाव ९५

तासगाव ८०

कवठेमहांकाळ ६४

खानापूर ५९

आटपाडी ५७

पलूस २९