सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून, बुधवारीही हेच दिलासादायक चित्र कायम होते. दिवसभरात १२७४ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर १६१२ जण कोरोनामुक्त झाले. परजिल्ह्यातील तिघांसह जिल्ह्यातील ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. म्युकरमायकोसिस झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, शिवाय उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येतही घट झाली आहे. जिल्ह्यातील ३५ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात सांगली ४, मिरज व कुपवाड प्रत्येकी १, तर वाळवा तालुक्यात ६, जत, मिरज तालुक्यांत प्रत्येकी ५, पलूस ३, आटपाडी, कडेगाव, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यांत प्रत्येकी २, खानापूर आणि शिराळा तालुक्यांत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने आरटीपीसीआर अंतर्गत २०५५ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ५८३ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर रॅपिड अँटिजनच्या ३९९३ जणांच्या तपासणीतून ७२९ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत घट झाली असून, सध्या १२ हजार ८७६ जण उपचार घेत आहेत. त्यातील २०६४ जणांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्यातील १७९१ जण ऑक्सिजनवर, तर २७३ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
परजिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाला असून, नवे ३८ जण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
चौकट
म्युकरमायकोसिसचे दोन बळी
जिल्ह्यात म्युकरमायकोसिस बाधितांची संख्या कायम असून, बुधवारी दिवसभरात उपचार घेत असलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात १०८ रुग्ण असून, मृतांची संख्या चारवर पोहोचली आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ११३२०८
उपचार घेत असलेले १२८७६
कोरोनामुक्त झालेले ९७०६६
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३२६६
बुधवारी दिवसभरात
सांगली १२१
मिरज ३८
वाळवा १९७
मिरज तालुका १९४
कडेगाव १२१
तासगाव, शिराळा ११९
जत १११
खानापूर १०८
पलूस ६९
आटपाडी ५१
कवठेमहांकाळ २६