शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

सत्ताधाऱ्यांचा सर्व पक्षांसोबत भ्रष्टाचार

By admin | Published: March 22, 2017 11:37 PM

मेधा पाटकर : वाळव्यात नागनाथअण्णा नायकवडी यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम

वाळवा : सहकाराला खासगीकरणाकडे नेण्याचा मार्ग महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी बनवला आहे. त्यातील काहीजण आज तुरुंगात आहेत. सर्व पक्षांना सत्तेत सामावून घेऊन भ्रष्टाचार करायचा, असाच यांचा पवित्रा असल्याचे प्रतिपादन नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी बुधवारी केले. भ्रष्टाचारमुक्त संस्था चालविणारी माणसे दुर्मिळ होत चालली आहेत. राजकीय मूल्यहीनतेची तत्त्वे देशाच्या मानगुटीवर बसली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या पाचव्या स्मृतिदिनी आयोजित जाहीर सभेत प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्यासह अ‍ॅड. सुभाष पाटील, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, कार्यक्रमाचे निमंत्रक वैभव नायकवडी, संकुलाच्या मार्गदर्शिका व क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांच्या पत्नी कुसूमताई नायकवडी, प्रा. डॉ. बाबूराव गुरव प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील होते. पाटकर म्हणाल्या की, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची जमीन विक्री राजकीय खरेदीदारांनीच केली आहे, परंतु क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांनी सहकारी तत्त्वाला कोठेही भगदाड पडू नये, याची जाणीव ठेवूनच हुतात्मा कारखान्याची उभारणी केली आहे. ‘हुतात्मा’ची वाटचाल अत्यंत प्रेरणादायी आहे. जेथे ऊस पिकत नाही, तेथे साखर कारखाने आणि त्याद्वारे भूजल हडप करणे, याला आमचा कायमचा विरोध राहील.भाई वैद्य म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीनंतर घटनेवर हल्ला करून देशाला यादवी युध्दाकडे नेले जात आहे. भाजप, नरेंद्र मोदी सत्तेवर नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सत्तेवर आला आहे. त्यांनी प्रारंभापासूनच घटनेला विरोध केला आहे. २०२४ नंतर पुढे निवडणुका होणार नाहीत, तर लष्कराच्या साहाय्याने हिटलरशाही सुरू होईल. त्यासाठी राजकारणाचा पट बदलून नव्याने मांडावा लागेल. सर्व पक्षांनी वास्तवतेचे भान ठेवणे गरजेचे आहे. प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले की, शेतकरी आत्महत्या करीत असताना ज्यांच्या पोटातील पाणीसुध्दा हालत नाही, ते श्रमजीवी शेतकऱ्यांचे शत्रू आहेत. शेतकरी संघटनेचे नेते म्हणवून घेणारे आता सरकारजमा झाले आहेत. वैभव नायकवडी व सौ. नंदिनी नायकवडी यांनी मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या विस्तारीकरण बांधकामाचा प्रारंभ मेधा पाटकर व भाई वैद्य यांच्याहस्ते करण्यात आला. प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी आभार मानले. प्रा. राजा माळगी, प्रा. डॉ. जे. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)व्यवस्था : विषमतेवर आधारितमेधा पाटकर म्हणाल्या की, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदी येणे म्हणजे जातीयवादाचे, धर्मांध शक्तींचे उफाळून येणे होय. ३५ लाख कोटीच्या घरातील भांडवलदारांना सूट मिळते, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही. कर्जमाफी देऊन हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी विषमतेवर आधारित व्यवस्था उलटून टाकली पाहिजे. ३१ वर्षे लढून सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न पूर्णपणे मिटलेले नाहीत. धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त यांचा प्रश्न हिणवून चालणार नाही.वाळवा येथे बुधवारी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी स्मृतिदिनानिमित्त जाहीर सभेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून अ‍ॅड. सुभाष पाटील, अरूण लाड, वैभव नायकवडी, प्रा. डॉ. एन. डी. पाटील, भाई वैद्य, कुसूमताई नायकवडी, प्रा. डॉ. बाबूराव गुरव उपस्थित होते.