शहरं
Join us  
Trending Stories
1
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
2
"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?
3
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स
4
“रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत
5
घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?
6
ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS
7
"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?
8
काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला
9
PC Jewellers Share Price : वर्षभरात ६००% नी वाढला 'हा' Multibagger; आता १० भागांमध्ये स्प्लिट होणार, शेअरमध्ये तुफान तेजी
10
मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश
11
शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की' 
12
"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
13
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
14
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
15
'छोटा पॅकेट बडा धमाका', फक्त ९१ रुपयांत ९० दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा BSNLचा नवा प्लॅन
16
लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन
17
आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?
18
ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा
19
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
20
अभिनेत्यांना रात्री भेटण्यासाठी नकार दिल्यामुळे या अभिनेत्रीला काम मिळणं झालं बंद, बॉलिवूडमधून झाली होती गायब

वास्तवातून सृजनशील साहित्याची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 7:18 AM

भिलवडी : वाचकाला अंतर्मुख व अस्वस्थ करणारे साहित्य सर्वाधिक गुणात्मक असते. विचारांचा वसा घेऊन व्रतस्थपणे वास्तवाला भिडल्याशिवाय सृजनशील साहित्याची ...

भिलवडी : वाचकाला अंतर्मुख व अस्वस्थ करणारे साहित्य सर्वाधिक गुणात्मक असते. विचारांचा वसा घेऊन व्रतस्थपणे वास्तवाला भिडल्याशिवाय सृजनशील साहित्याची निर्मिती होत नाही,, असे प्रतिपादन साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन यांनी केले.

भिलवडी (ता. पलूस) येथे सुभाष कवडे लिखित ‘जांभळमाया’ या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झाले. उद्योगपती गिरीश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली होते. वैजनाथ महाजन व प्रा. प्रदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. वैजनाथ महाजन म्हणाले की, मराठी साहित्यात शिक्षक साहित्यिकांनी लेखनाची मोठी परंपरा निर्माण केली. सुभाष कवडे हे साहित्य क्षेत्रातील आनंदयात्री आहेत. ते समाजासाठी जे स्वीकार्य आहे तेच सकारात्मकरीत्या मांडतात. त्यांचे पुस्तक प्रकाशित होणं हा आत्मिक आनंदाचा भाग आहे. उद्योजक गिरीष चितळे म्हणाले की, ‘जांभळमाया’ हे पुस्तक आत्मिक समाधानाबरोबर अनुभव विश्व ही जागृत करते.

सुभाष कवडे यांच्या संघर्षाचे सार म्हणजे जांभळमाया, असे प्रतिपादन कवी प्रदीप पाटील यांनी केले.

अमरसिंह देशमुख यांनी माणदेशातील तत्कालीन परिस्थितीचे व संघर्षाचे चित्रण लेखणात उतरल्याचे नमूद केले, त्याचसोबत "व्यक्त व्हा व अधिकाधिक लिहते व्हा" असा संदेश त्यांनी आपल्या भाषणात दिला.

विठ्ठल मोहिते यांनी प्रास्ताविक व स्वागत, शरद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. डी. आर. कदम यांनी आभार मानले. यावेळी प्रा. संजय ठिगळे, शाहीर पाटील, जी. जी. पाटील, ए. के. चौगुले, भू. ना. मगदूम, रमेश पाटील, पुरुषोत्तम जोशी, महावीर वठारे, हणमंत डिसले आदी उपस्थित होते.

फोटो-३१भिलवडी१

फोटो ओळ - भिलवडी (ता. पलुस) येथे ‘जांभळमाया’ या पुस्तकाचे प्रकाशन गिरीश चितळे, अमरसिंह देशमुख, प्रा. वैजनाथ महाजन, प्रा. प्रदीप पाटील, सुभाष कवडे यांच्या हस्ते करण्यात आले.