शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘वंचित’ने गर्दी खेचली, ‘आघाडी’त बेचैनी वाढली; मतांच्या वाटणीची काँग्रेसला चिंता

By अविनाश कोळी | Updated: December 4, 2023 16:30 IST

भाजपचे मताधिक्य घटले

अविनाश कोळीसांगली : वंचित बहुजन आघाडीनेसांगलीत नुकतीच सत्ता संपादन निर्धार सभा घेत लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले. या सभेने खेचलेल्या गर्दीमुळे महाविकास आघाडीत विशेषत: काँग्रेसमध्ये बेचैनी वाढली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने पदरात पाडलेली मते निर्णायक ठरली होती. सांगलीत पुन्हा वंचितला मिळणारा प्रतिसाद कॉंग्रेसची चिंता वाढविणारा आहे.

सांगली लोकसभा मतदार संघावर दीर्घकाळ काँग्रेसचे वर्चस्व राहिले. २०१४ पासून हा भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. दोनपैकी एका निवडणुकीत काँग्रेसने हा बालेकिल्ला ताब्यात घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. मागील निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील हे स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडून लढले होते.मागील निवडणुकीत विशाल पाटील यांच्यासमोर केवळ भाजपचे खासदार संजय पाटील यांचेच आव्हान नव्हते, तर वंचित बहुजन आघाडीने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून तगडा उमेदवार उभा केला होता. निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणमिमांसा करताना काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीकडे बोट केले होते.आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा विशाल पाटील प्रयत्नशील आहेत. काँग्रेसकडून यासाठी तयारी सुरू असतानाच पुन्हा वंचित बहुजन आघाडीने सांगली लोकसभा मतदारसंघात रणशिंग फुंकले. अर्थात ते इंडिया आघाडीत येण्यासाठी इच्छुक आहेत. तसा प्रस्तावही दिला आहे, मात्र इंडिया आघाडीत त्यांचा समावेश अद्याप झालेला नाही. त्यामुळे वंचितची डोकेदुखी काँग्रेससमोर कायम आहे.

प्रकाश आंबेडकरांचा इशारावंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या सांगलीतील सभेला गर्दी झाली. सभेत वंचितच्या पदाधिका-यांनी ‘इंडिया’मध्ये सहभाग न झाल्यास स्वतंत्र लढण्याचा इशारा दिला. या इशाऱ्याने काँग्रेसची चिंता वाढू शकते.

पक्षनिहाय मतांची टक्केवारी

  • भाजप ४२.७७
  • स्वाभिमानी शे. सं. २८.९६
  • वंचित बहुजन आघाडी २५.२३
  • इतर ३.०४

इतिहास काय सांगतो

  • १९६७ ते २०१९
  • काँग्रेसचा स्ट्राइक रेट ७५ टक्के
  • भाजपचा स्ट्राइक रेट २५ टक्के
  • काँग्रेस विजयी - १२ वेळा
  • भाजप विजयी - २ वेळा

भाजपचे मताधिक्य घटले२०१४ च्या निवडणुकीत भाजपचे खासदार संजय पाटील यांना काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांच्याविरोधात २३ टक्क्यांचे मताधिक्य होते. २०१९ मध्ये हे मताधिक्य १४ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे काँग्रेसला आगामी निवडणुकीत विजयाची आशा वाटते. परंतु, वंचितच्या भूमिकेचाही त्यांना फटका बसू शकतो.

टॅग्स :SangliसांगलीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीcongressकाँग्रेस