शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

पावसाचा थांबेना फेरा, वाया गेला खरीप हंगामाचा पेरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 13:46 IST

पावसामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील अंदाजे पंचवीस हजार एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावरील खरिपाच्या पिकांचे नुकसान

तासगाव : तालुक्यात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पावसाची संततधार कायम आहे. या पावसामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील अंदाजे पंचवीस हजार एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावरील खरिपाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. उरल्या-सुरल्या पिकांतून उत्पादन मिळेल, याबाबतही साशंकता आहे. त्यामुळे उत्पादन दूरच, घातलेला खर्चही वाया गेला आहे. नुकसानीचे प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

तासगाव तालुक्यात खरिपाचे ३३ हजार १२८ हेक्टर क्षेत्र आहे. यंदा मान्सूनचे उशिराने आगमन झाले. त्यामुळे त्यापैकी ३० हजार २४९ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. सुरुवातीला पाऊस उशिरा आल्याने, पेरा उशिरा झाला. मात्र पेरणी झाल्यानंतर सुरू झालेला पाऊस थांबता थांबला नाही. काही दिवसांचा अपवाद सोडला तर तालुक्यात संततधार कायम होती. उघडीप मिळाली तरी सूर्यदर्शन हाेत नव्हते. त्यामुळे पेरा वाया गेला. विशेषतः तालुक्याच्या पूर्व भागात ज्वारी, बाजरीसह कडधान्याची पिके वाया गेली आहेत.

पेरणीसाठी खते, औषधे, बियाणे, मेहनतीसाठी कराव्या लागलेल्या खर्चाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. शासनाकडून अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी नुकसानभरपाई जाहीर केली आहे; मात्र तासगाव तालुक्यातील अतिवृष्टीची नोंद शासन दरबारी नाही. त्यामुळे भरपाई मिळणार नाही. मात्र बहुतांश शेतकऱ्यांना नुकसानीची झळ सहन करावी लागली आहे.

अतिवृष्टी नाही; नुकसानभरपाई नाही

सततच्या पावसाने तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, भुईमूग आणि मका पिकाचा अपवाद सोडला तर अन्य पिकांच्या बाबतीत उत्पादन नाही. शासन दरबारी अतिवृष्टीसाठीच भरपाई जाहीर केली आहे. तालुक्यात अतिवृष्टीची नोंदच नसल्यामुळे शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार आहेत.

तालुक्यातील पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये) :

  • खरीप ज्वारी : १५ हजार ७५५
  • मका : १ जार ८८१
  • इतर तृणधान्य : ७०
  • तूर : ४९२
  • मूग : ३०७
  • उडीद : ८६२
  • इतर कडधान्य : ४१५
  • भुईमूग : चार हजार ७०५
  • सोयाबीन : पाच हजार ७५२

तासगाव तालुक्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यायला हवी. शेतीला पाणी लागल्याने शेती धोक्यात आली आहे. रोजगार हमी योजनेतून पाणी निचरा करण्यासाठी उपाययोजना अंमलात आणायला हव्यात. - संजय पाटील, माजी सभापती, पंचायत समिती, तासगाव

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीRainपाऊस