शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
2
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
3
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
4
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
5
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
6
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
7
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
9
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना
10
संपादकीय: अभिजात मराठी!
11
"दिवट्या आमदार..."; सुनील टिंगरेंवर शरद पवारांची टीका; अजितदादा म्हणाले, "बदनामीचा प्रयत्न..."
12
"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा
13
शेवटच्या दिवशी अरबाजची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री; धावत येऊन निक्कीला उचललं, बेडरुममध्ये घेऊन गेला अन्...; सदस्यही पाहतच राहिले
14
Pan Cardबद्दल तुम्हाला किती माहितीये? पॅन क्रमांकाचा अर्थ काय? एकात असतं तुमचं आडनाव
15
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
16
Taro Card: देवीची कृपा मिळवून देणारा चैतन्यमयी आठवडा; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार 
18
दररोज घसतोय Ola Electricचा शेअर; ₹१०० च्या खाली आला भाव; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
19
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
20
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला

खानापूर तालुक्यामध्ये दुष्काळाचे उग्र रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 11:46 PM

दिलीप मोहिते । लोकमत न्यूज नेटवर्क विटा : सांगली जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या खानापूर तालुक्यातील बाणूरगड, कुसबावडे, ताडाचीवाडी परिसरात ...

दिलीप मोहिते ।लोकमत न्यूज नेटवर्कविटा : सांगली जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या खानापूर तालुक्यातील बाणूरगड, कुसबावडे, ताडाचीवाडी परिसरात दुष्काळाने उग्र रूप धारण केले आहे. या गावांमधील विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या असून दुष्काळी उपाययोजनेचा भाग म्हणून केवळ टॅँकरच्या दीड खेपा दिल्या जात आहेत. त्यामुळे दुष्काळाचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांमधून प्रशासन व राज्यकर्त्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.खानापूर तालुक्याच्या पूर्व भागातील घाटमाथ्यावरील बाणूरगड हे सांगली जिल्ह्यातील शेवटचे गाव. अठरा विश्व दारिद्र्याचा सामना करावा लागत असलेल्या या गावातील लोकांवर गेल्या तीन वर्षांपासून वरूणराजाही कोपला आहे. सुमारे सोळाशे ते सतराशे लोकसंख्या असलेल्या बाणूरगड, ताडाचीवाडी व कुसबावडे परिसरात जनावरांची संख्या आठशे ते नऊशेच्या आसपास आहे. भौगोलिकदृष्ट्या अत्यंत उंचावर असलेली ही तीन गावे सध्या तरी कोणत्याच जलसिंचन योजनेच्या आराखड्यात समाविष्ट नाहीत. त्यामुळे या परिसरात शेतीसह पिण्याचा पाणीप्रश्नही गंभीर बनला आहे.गेल्या तीन वर्षांपासून पाऊस नसल्याने शेती भकास झाली आहेच, शिवाय पिण्याचा पाणी प्रश्नही सध्या मोठ्या प्रमाणात भेडसावू लागला आहे. बाणूरगड गावात चार ते पाच शिवकालीन विहिरी, तीन कूपनलिका आहेत. परंतु, त्यात चिमणीला पिण्याइतकेही पाणी नाही. प्रशासनाने टॅँकरने पाणीपुरवठा सुरू केला असला तरी, केवळ दीड खेप म्हणजे १५ हजार लिटर पाणी गावाला दिले जात आहे. टॅँकरच्या खेपा वाढविण्याची ग्रामस्थांची मागणी आजही प्रलंबित असून, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.प्रशासनाने जनावरांच्या चारा व पाण्याची व्यवस्था केली नाही. त्यामुळे पशुधन धोक्यात आले असून, चाºयाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. परिणामी, येथील लोकांवर स्थलांतराची वेळ आली आहे. बाणूरगड, ताडाचीवाडी, कुसबावडे परिसरातील भीषण दुष्काळाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. विहिरी, कूपनलिका कोरड्या ठणठणीत पडल्याने पाण्याची व्यवस्था तातडीने करणे गरजेचे बनले आहे. पाणी व चारा न मिळाल्यास येथील लोकांवर जीवापाड जपलेली मूक जनावरे कवडीमोल किंमतीला विकावी लागणार आहेत. तरीही ग्रामस्थांसमोरील प्रश्नांची गर्दी थांबणार नाही.परिसरातील भीषण परिस्थितीकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही गांभीर्याने पहावे, अशी आर्त हाक बाणूरगड परिसरातील दुष्काळग्रस्तांनी दिली आहे.प्रशासन, नेत्यांकडून दुष्काळी भाग दुर्लक्षितगेल्या चार वर्षांपासून बाणूरगड परिसरात पाऊस पडला नाही. परिणामी, चारा उत्पन्न झाले नाहीच, शिवाय पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न यावर्षी मोठ्या प्रमाणात गंभीर बनला आहे. शासनाकडे टॅँकरच्या खेपा वाढवून देण्याबाबत वारंवार पाठपुरावा केला. परंतु, त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. आमच्या मागणीकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे चाºयाअभावी पशुधन धोक्यात आले आहे. चाºयासाठी जनावरे गोठ्यात हंबरडा फोडत आहेत. पण त्यांच्याकडे केवळ पाहत बसण्याशिवाय लोकांपुढे पर्याय उरला नसल्याचे बाणूरगडचे सरपंच सज्जन बाबर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.