शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

नकट्या विहिरीचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2016 11:49 PM

मिरजेतील ऐतिहासिक विहीर : नष्ट होण्याच्या मार्गावर; पुनरुज्जीवनाची मागणी

मिरज : मिरजेतून लातूरला पाणी पुरवठ्यासाठी रेल्वे स्थानकातील हैदरखान विहिरीने महत्त्वाची भूमिका बजावली असताना, मीरासाहेब दर्ग्यातील ऐतिहासिक नकट्या विहिरीचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शहरातील ऐतिहासिक व मोठ्या विहिरींची दुरवस्था दूर करण्याची मागणी होत आहे. मीरासाहेब दर्ग्यातील आदिलशाहीच्या काळात पंधराव्या शतकात दर्ग्यात पाणी वापरासाठी खोदण्यात आलेली विहीर ‘नकट्याची विहीर’ या नावाने ओळखली जाते. या पाचशे वर्षे जुन्या ऐतिहासिक विहिरीत गेल्या २० वर्षांपासून कचरा टाकण्यात येत आहे. दर्गा आवारातील या विहिरीचा आकार मोठा असून, शंभर फूट खोल विहिरीत कमानींचे दगडी बांधकाम आहे. १९९६ पर्यंत विहिरीतील पाण्याचा वापर सुरू होता, मात्र त्यानंतर पाण्याचा वापर नसल्याने विहिरीत कचरा टाकला जात आहे. कचरा टाकण्यासाठी वापर करण्यात येत असल्याने या ऐतिहासिक विहिरीचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. विहिरीतील कमानींची पडझड झाली आहे. या विहिरीतील पाण्याचे मोठे झरे कचरा व मातीमुळे बंद झाले आहेत. काही वर्षांपूर्वी या विहिरीतील गाळ काढण्याचा प्रयत्न केला होता; मात्र पाण्याचे मोठे झरे लागल्याने गाळ काढणे शक्य झाले नाही. (वार्ताहर)मोठ्या प्रमाणावर पाणीसाठ्याची क्षमताया मोठ्या विहिरीचे पुनरुज्जीवन केल्यास मोठ्याप्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. यावर्षीचा दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर विहिरी, बंधारे व पाणीसाठ्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. लातूरला पाणी पुरवठ्यासाठी रेल्वेच्या हैदरखान विहिरीची साफसफाई व स्वच्छता करून त्यात पाणीसाठा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मीरासाहेब दर्गा आवारातील ऐतिहासिक नकट्या विहिरीतील गाळ काढून विहिरीच्या पुनरुज्जीवनाची मागणी होत आहे. मिरजेतील मीरासाहेब दर्ग्यातील ऐतिहासिक नकट्या विहिरीची दुर्लक्षामुळे पडझड झाली आहे. या विहिरीत आता परिसरातील कचराही टाकला जात आहे.