शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

सांगलीतील खानापूर, मिरज विधानसभा मतदारसंघावरून 'महाआघाडी'मध्ये नाराजी नाट्य, भाजपात अतंर्गत गटबाजी

By अशोक डोंबाळे | Published: August 24, 2024 6:07 PM

महायुतीमध्ये सध्या तरी वादळापूर्वीची शांतता

अशोक डोंबाळे

सांगली : महाविकास आघाडीमध्ये खानापूर, मिरज व सांगलीच्या जागेवरून वादंग होण्याची चिन्हे आहेत. खानापूर, मिरज विधानसभा मतदारसंघांवर उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने दावा सांगितल्यामुळे नेत्यांमध्ये नाराजी नाट्य निवडणूकीपूर्वीच रंगले आहे. महायुतीमध्ये सध्या तरी वादळापूर्वीची शांतता आहे. सांगली, मिरज, शिराळा, जतमध्ये भाजपला अंतर्गत गटबाजीचाच सर्वाधिक फटका बसणार आहे.विधानसभा निवडणुकांसाठी ऑक्टोबरपासून आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने मतदारयादी करण्यासह निवडणुकीची पूर्णतयारी केली आहे. महाआघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनीही विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. महाआघाडीस लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते मोठ्या जोशात विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीमध्ये प्रमुख काँग्रेस, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा समावेश आहे. काँग्रेसची सध्या सांगली, पलूस-कडेगाव, मिरज आणि जतमध्ये मजबूत बांधणी आहे. यामुळे काँग्रेसचे खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. विश्वजित पाटील यांनी सांगली, पलूस-कडेगाव, जत, मिरज विधानसभेबरोबरच खानापूर विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. येथून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांचे नातू व काँग्रेसचे युवा नेते जितेश कदम तयारी करत आहेत. शरदचंद्र पवार गटाचे शिराळा, इस्लामपूर आणि तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघावर वर्चस्व असून, येथे त्यांचे विद्यमान आमदार आहेत. या तीन जागा सोडून मिरज, खानापूर आणि जत विधानसभेच्या जागांवर शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दावा केला आहे. उद्धवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सध्या तरी सांगली, मिरज आणि खानापूर विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे; पण खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार असल्यामुळे तो मतदारसंघ त्यांच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खानापूर आणि मिरज विधानसभा मतदारसंघावरून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असे प्रमुख तीन पक्ष आहेत. याशिवाय, काही छोटे पक्ष, संघटनाही त्यांच्या सोबत आहेत; पण विधानसभा निवडणुकीत त्याच्या वाट्याला महायुतीचे मोठे पक्ष जागा सोडण्याची शक्यता फारच कमी आहे. भाजपचे सांगली, मिरज विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आहेत; पण पक्षांतर्गत बंडाळीमुळे सांगली, मिरजेच्या जागा टिकविण्याचे भाजपसमोर मोठे आव्हान आहे.शिराळा, जत, खानापूर विधानसभा मतदारसंघातही भाजप नेत्यांमध्येच कुरघोड्याचे राजकारण रंगले आहे. शिवसेना शिंदे गटाने सध्या तरी खानापूर विधानसभा मतदारसंघावर हक्क सांगितला आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे सध्या तरी तासगाव-कवठेमहांकाळ, शिराळा, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघावर लक्ष ठेवले आहे. यापैकी एखादा मतदासंघ मिळू शकतो.

महायुतीने या विधानसभांवर केला दावामहायुतीमध्ये भाजपने सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, जत, शिराळा, इस्लामपूर मतदारसंघावर, तर शिवसेना शिंदे गटाने खानापूर, राष्ट्रवादी अजित पवार गटाने तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे.

महाविकास आघाडीने या विधानसभांवर केला दावाकाँग्रेसने सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, जत, खानापूर मतदारसंघावर, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने शिराळा, इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ, मिरज, खानापूर मतदारसंघावर दावा केला आहे. उद्धवसेनेकडूनही खानापूर, मिरज, सांगली विधानसभेवर दावा केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा