शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

आष्ट्यात अभयारण्य, वारणा धरणग्रस्तांचे सात-बारा तातडीने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 4:32 AM

आष्टा : आष्टा येथील चांदोली अभयारण्यग्रस्त व वारणा धरणग्रस्त नागरिकांचे सात-बारा तातडीने करण्यात यावेत, वारणा धरणग्रस्त संकलनातून ...

आष्टा : आष्टा येथील चांदोली अभयारण्यग्रस्त व वारणा धरणग्रस्त नागरिकांचे सात-बारा तातडीने करण्यात यावेत, वारणा धरणग्रस्त संकलनातून नाव कमी करून चांदोली अभयारण्य संकलन धरून वन खात्याकडून अनुदान मिळावे, अशी मागणी मारुती गणू रेवले यांच्यासह खातेदारांनी जिल्हाधिकारी यांच्यासह पुनर्वसन खात्याकडे केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मूळ गाव पेटलोंड वसाहतीतील खातेदारांना १९८६ ते १९९९ पर्यंत प्लॉट वाटप करून त्याप्रमाणे पुनर्वसन करून आदेशाप्रमाणे दाखले दिले आहेत. त्याप्रमाणे सर्वजण घरकुल बांधून वास्तव्य करीत आहेत. महसूल व पुनर्वसन खात्याने वेळोवेळी पाहणी केली आहे; मात्र अडचणीमुळे २५ खातेदारांचे सात-बारा झाले. १४ खातेदारांची सात-बारा झालेले नाहीत. मारुती पाटील, बाबूराव अनुसे, भागुजी अनुसे, गंगाराम अनुसे, सईबाई सावंत, दगडू रेवले, सीताराम घोलप यांची सात-बारा नोंद झालेली नाही. मारुती येवले-पाटील यांना १९९९ मध्ये संकलन तयार करून त्यांची कुटुंब संख्या आठ धरून सहा गुंठे प्लॉट व पाच एकर जमीन दिली. त्यानंतर २०१४ मध्ये एक व्यक्ती कमी करून देयक कमी करत आहेत. १९९९ च्या आदेशाप्रमाणे संकलन दुरुस्त करून सात-बारा मिळावा. तसेच काही खातेदारांची खाती वारणा धरणाच्या संकलनमधून कमी करून चांदोली अभयारण्याच्या संकलनमध्ये नोंद करण्यात यावीत, अशी मागणी धरणग्रस्तांनी केली आहे.