शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

दीड हजारासाठी महाराष्ट्र मोदींकडे गहाण ठेवू नका, मल्लिकार्जुन खरगे यांचे जनतेला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 11:55 AM

राज्यातील जनतेने स्वाभिमान जपायला हवा

सांगली : मते मिळविण्यासाठी ‘लाडकी बहीण’ योजनेचे आमिष दाखविले जात आहे. जनतेने दीड ते दोन हजार रुपयांसाठी नरेंद्र मोदींकडे महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवू नये. त्यांच्या पैशाला ठोकर मारून संविधान संपवू पाहणाऱ्या भाजप सरकारला धडा शिकवावा, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले.कडेगाव येथे दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळा व स्मारकाचा लोकार्पण सोहळा गुरुवारी पार पडला. व्यासपीठावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वेडेट्टीवार, खासदार प्रणिती शिंदे, खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार डॉ. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, आमदार सतेज पाटील, मोहनराव कदम आदी उपस्थित होते.खरगे म्हणाले, लाेकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे सर्वाधिक खासदार निवडून दिले. आता विधानसभेच्या निवडणुकीतही महाराष्ट्रातील जनतेने अशीच साथ द्यायला हवी. महाराष्ट्र जिंकला तर देश जिंकल्यासारखे आहे. भाजपचे सध्याचे सरकार हे लोकांनी निवडून दिलेले नाही. त्यांनी दुसऱ्यांचे पक्ष फोडून सरकार आणले आहे. नकली पक्ष त्यांच्याकडे, तर मूळ व खरे पक्ष आमच्याकडे आहेत.महाराष्ट्राच्या प्रगतीत सहकार व शिक्षण संस्थांचा वाटा मोठा आहे. भाजपला राजकीय फायद्यासाठी या संस्था संपवायच्या आहेत. त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्याकडे सहकार खाते घेतले आहे.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही राजकारणनिवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोणत्याही इमारतीचे, पुतळ्याचे घाईगडबडीत उद्घाटन करण्यात मोदी धन्यता मानत आहेत. त्यामुळेच त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेले पूल, पुतळे कोसळत आहेत. राममंदिरच्या छतालाही आता गळती लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारतानाही गडबड झाली आहे. त्यातूनच पुतळा कोसळला. महाराष्ट्रातील शिल्पकारांनी साकारले अनेक पुतळे संसदेत दिमाखात ५० वर्षांहून अधिक काळ उभे असताना मालवणचा पुतळा कसा पडला? असा सवाल खरगे यांनी केला.

मोदींपेक्षा विश्वजित यांची ताकद अधिकलोकसभेच्या वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदींना जितके मताधिक्य मिळाले तेवढेच मताधिक्य एका विधानसभा मतदारसंघातून विश्वजित कदम यांना मिळाले आहे. त्यावरून त्यांची ताकद दिसून येते, असे मत खरगे यांनी व्यक्त केले.

संविधान संपवायचा डावराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक शासनाच्या प्रत्येक विभागात शिरले आहेत. त्यांना संविधान संपवायचे आहे. अभ्यासक्रम बदलण्याचा डावही त्यांनी आखला आहे, अशी टीका खरगे यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदी