शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

शेतकऱ्यांना लुटून 'दत्त इंडिया' चालवू नका, अन्यथा..; राजू शेट्टींनी दिला इशारा

By अशोक डोंबाळे | Published: November 04, 2023 6:03 PM

इथेनॉल निर्मिती बंद करुन केंद्रावर दबाव टाका

सांगली : येथील दत्त इंडियाचे व्यवस्थापन पैसे मिळविण्यासाठीच इथे आले आहे. शेतकऱ्यांना लुटून वसंतदादा साखर कारखाना चालविण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना गतवर्षीच्या गळीत हंगामास गेलेल्या उसाला प्रति टन ४०० रुपये हप्ता मिळालाच पाहिजे. मागील गळिताचा हिशोब द्या, अन्यथा कारखाना बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जन आक्रोश पदयात्रा शनिवारी सकाळी वसगडे (ता. पलूस), नांद्रे कर्नाल मार्गे मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे आली. पदयात्रेचे अनेक गावांमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. नांद्रे, मौजे डिग्रज, कर्नाळमध्ये जन आक्रोश पदयात्रेवर जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी आयोजित सभेत माजी खासदार राजू शेट्टी बोलत होते. यावेळी दत्त इंडियाचे व्यवस्थापक शरद मोरे यांनी विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले. राजू शेट्टी पुढे म्हणाले, कारखानदार नफ्यातील वाटा द्यायला तयार नाहीत. मात्र, गेल्या वर्षीचे ४०० रुपये घेतल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही. साखरेचा भाव वाढला आहे. त्यामुळे कारखानदारांना ज्यादाचे जे पैसे मिळाले आहेत, त्यातील ४०० रुपये आम्ही मागत आहोत. त्यामुळे तत्काळ ४०० रुपये द्यावेत, यंदाचा योग्य दर जाहीर करावा, अन्यथा गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संदीप राजोबा, श्रीपाल चौगुले, अजित लांडे, कुमार पाटील आदी उपस्थित होते.

इथेनॉल निर्मिती बंद करुन केंद्रावर दबाव टाकासाखर कारखान्यांनी उत्पादीत केलेल्या इथेनॉलवर कोणतीही प्रक्रीया न करता केंद्र शासन पेट्रोलमध्ये मिसळत आहे. त्या इथेनॉलला प्रति लिटर ४९ रुपये केंद्र शासन देत असून तेच पेट्रोल १०६ रुपये लिटरने ग्राहकांना विक्री होत आहे. एवढी मोठी तफावत केंद्र शासनाने कशासाठी ठेवली आहे. इथेनॉलचे दर वाढविण्यासाठी केंद्र शासनावर साखर कारखानदारांनी दबाव टाकला पाहिजे. यासाठी कारखान्यांनी इथेनॉलचे उत्पादन बंद करावे, असे आवाहनही राजू शेट्टी यांनी केले

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टी