शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

सांगली जिल्ह्यात दुष्काळ! सव्वा लाख लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा; मार्चमध्ये तीव्रता वाढण्याची चिन्हे

By संतोष भिसे | Published: February 12, 2024 6:00 PM

संतोष भिसे सांगली : यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी तालुक्यांमध्ये टंचाईस्थिती वाढू लागली आहे. जत आणि आटपाडी तालुक्यांतील ५३ ...

संतोष भिसे

सांगली : यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी तालुक्यांमध्ये टंचाईस्थिती वाढू लागली आहे. जत आणि आटपाडी तालुक्यांतील ५३ गावे आणि ३९२ वाड्यावस्त्यांना टंचाईची झळ बसू लागली आहे. सद्य:स्थितीत जिल्हाभरात सुमारे सव्वा लाख लोकसंख्येला ५३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.जून ते सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या ६८ टक्केच पाऊस झाला. दिवाळीत झालेल्या अवकाळी पावसाने रब्बीला जीवदान दिले. पिके वाचली; पण पिण्याच्या पाण्यासाठी या पावसाचा उपयोग झाला नाही. राज्यात सर्वांत कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्ये सांगलीचा समावेश आहे. दुष्काळी जत आणि आटपाडी तालुक्यातील गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. खानापूर आणि कवठेमहांकाळ तालुक्यांतही टंचाई जाणवू लागली आहे. आजमितीस जत आणि आटपाडी या दोन्ही तालुक्यांत मिळून ५३ गावांना ५३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

यामध्ये जत तालुक्यातील ५०, तर आटपाडी तालुक्यातील तीन गावांचा समावेश आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील एक आणि खानापूर तालुक्यातील तीन गावांतही पाणीटंचाई आहे; पण तेथे अद्याप टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. जत तालुक्यातील एक लाख १९ हजार ९२१ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

टॅंकर सुरू असलेली तालुकानिहाय गावेजत : निगडी खुर्द, शेड्याळ, पांढरेवाडी, वळसंग, एकुंडी, हळ्ळी, बसर्गी, सालेगिरी, पाच्छापूर, कुडनूर, वायफळ, गुगवाड, गिरगाव १, जाडरबोबलाद, काराजनगी, बेळोंडगी, मोकाशेवाडी, टोणेवाडी, सोनलगी, मुचंडी, जालीहाळ खुर्द, कागनरी, दरीबडची, कोळेगिरी, कोंत्येवबोबलाद, लमाणतांडा (दरीबडची), केरेवाडी (कोंत्येवबोबलाद), व्हसपेठ, खैराव, खंडनाळ, गुलगुंजनाळ, करेवाडी (तिकोंडी), दरीकोन्नूर, सिद्धनाथ, सुसलाद, पांडोझरी, सोरडी, खोजानवाडी, तिल्याळ, गोंधळेवाडी, अंकलगी, मोटेवाडी, भिवर्गी, मल्याळ - प्रत्येकी १. सिंदूर, सोन्याळ, संख, उमराणी, तिकोंडी, माडग्याळ - प्रत्येकी २. एकूण टँकर : ५०आटपाडी : आंबेवाडी, पूजारवाडी, विठलापूर - उंबरगाव प्रत्येकी १. एकूण टँकर : ०३

म्हैसाळ योजनेने तारलेसध्या म्हैसाळ सिंचन योजनेतून पाणीउपसा सुरू असून जत तालुक्यात पाणी पोहोचले आहे. या पाण्यामुळे मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यांतील बहुतांश गावांच्या पाझर तलावांत पाणी टिकून आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई तूर्त तरी नाही. अर्थात, मार्चअखेरपासून टंचाईच्या झळा तीव्र होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीdroughtदुष्काळ