शहरं
Join us  
Trending Stories
1
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
2
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
3
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
4
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
5
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
6
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
7
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
8
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
9
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
10
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
11
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
12
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
13
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
15
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
16
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
17
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
18
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
19
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
20
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी

सांगली जिल्ह्यात पावसाअभावी भातशेतीत उगवण, रोप लावणी थांबल्या

By शीतल पाटील | Published: July 05, 2023 5:44 PM

..तर भात पिके वाया जाणार

पुनवत : शिराळा तालुक्यातील भातशेतीला पावसाअभावी यंदा जबर फटका बसला आहे. आषाढातही पुरेसा पाऊस नसल्याने भाताच्या उगवण, रोप लागणीवर विपरीत परिणाम झाला आहे.शिराळा तालुक्यात मे-जून महिन्यात भाताच्या पेरण्या झाल्या आहेत. सुरुवातीला पाऊस नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भात वाफ्यात पाणी सोडून पिकाची उगवण करून घेतली. भुईमूग पेरण्याही उशिरा झाल्या. गेल्या महिनाभरात तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने पिकाच्या उगवण व वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे.भात या खरीप पिकाला सतत पाऊस व वाफ्यात पाण्याची आवश्यकता असते.आषाढ महिना जास्त पावसाचा महिना म्हणून ओळखला जातो. परंतु सध्या आषाढ निम्मा सरला तरी शिराळा तालुक्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे भाताचे वाफे कोरडेठाक आहेत. पाणवठे, ओढ्या-नाल्यांना पाणी नाही. पीक परिस्थिती समाधानकारक नाही. अधूनमधून केवळ रिमझिम स्वरूपात पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकात तणांनी जोर केला आहे. शिराळा पश्चिम भागात भाताच्या रोप लागणी खोळंबल्या आहेत. येत्या काही दिवसांत पुरेसा पाऊस झाला नाही, तर भात पिके वाया जाणार अशीच परिस्थिती आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसFarmerशेतकरी