शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

Sangli: वाकुर्डे कालव्याच्या गळतीमुळे मोठे नुकसान, शेतकऱ्यांचे उपोषण सुरू

By संतोष भिसे | Published: May 17, 2024 5:18 PM

५०० एकर शेती नापिक

विकास शहाशिराळा : वाकुर्डे बुद्रुक (ता. शिराळा) येथील करमजाई देवी मंदिरासमोर वाकुर्डे योजनेच्या पडवळवाडी ते मानकरवाडीपर्यंत असणाऱ्या १० किलोमीटर अंतरातील खुल्या कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. परिणामी उताराच्या बाजूची सुमारे ५०० एकर शेतजमीन नापीक झाली आहे. याचा फार मोठा फटका या भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे या संतप्त शेतकऱ्यांनी बळीराजा शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्राणांतिक उपोषणास सुरुवात केली आहे.शेतकऱ्यांनी यापूर्वी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांना निवेदन दिले होते. २०१७ पासून या भागातील शेतकरी शासन आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दाद मागत आहेत; मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद या व्यवस्थेकडून मिळालेला नाही. पडवळवाडी, नळवा वस्ती, माळ वस्ती, नारजी वस्ती, तरसे वस्ती, रामोशी वस्ती, पारगावकर वस्ती, धाकली अंत्री, जोतिबा मंदिर ते मानकरवाडी या परिसरातील कालव्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने हे शेतकरी गेल्या ७ वर्षांपासून याचा पाठपुरावा सुरू केला आहे; मात्र त्यांच्या या प्रश्नाकडे शासनाने कानाडोळा केला आहे. त्यामुळे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे कालव्यातून प्रचंड प्रमाणात पाण्याची गळती होऊन कालव्याशेजारी उताराला असणाऱ्या ५०० एकर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना कोणतेही पीक घेता येत नाही. धूळवाफेने भाताची पेरणी होत नाही. कालव्यासाठी ज्या जमिनी गेल्या त्याचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.उपोषणात शिवाजी शेटके, दगडू शेटके, वसंत शेटके, नाथाभाऊ शेटके, निवृत्ती शेटके, जगन्नाथ शेटके, कृष्णा शेटके, हणमंत माने, भाऊसाहेब जाधव, गोरख शेटके, बाळू शेटके, प्रकाश शेटके, हनुमंत माने, रघुनाथ सावंत, रंगराव पाटील, श्रीरंग सावंत, लक्ष्मण शेटके, साधू शेटके, राजाराम पडवळ आदी सहभागी झाले आहेत. जलसंपदाचे उपकार्यकारी अभियंता कमलाकर सूर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक अनिता मेणकर, उपअभियंता गुरू महाजन या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली.

अशा आहेत मागण्याकालव्याचा भराव शेतकऱ्यांच्या हद्दीत पडला असल्यास त्या क्षेत्राची आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, ज्यांच्या चुकीमुळे भराव पडला, त्यांच्या पगारातून, ठेकेदाराच्या संपत्तीतून भरपाई वसूल करून द्यावी. तसा अहवाल महिन्याभरात मिळावा. कालव्याचे दगडी बांधकाम, काँक्रीट अस्तरीकरण, लायनिंग, बेडकाँक्रीट यामध्ये ५० मायक्रॉन २२० पॉलिथिन पेपर वापरलाच नाही, त्याचे पंचनामे व्हावेत. लोखंडी गेट, कालव्यात चुकीच्या घातलेल्या सिमेंट पाईप आणि त्यावरील भराव व रस्ता यांचाही दर्जा चांगला नाही. ठेकेदार व संबंधित सर्व अभियंते, गुणवत्ता नियंत्रक यांचे संगनमत आहे. त्या सर्वांना जबाबदार धरून त्यांची चौकशी करावी. अवैध मार्गांनी मिळवलेली संपत्ती जप्त करून फौजदारी कारवाई करावी. ठेकेदारांना काळ्या यादीत समाविष्ट करावे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीagitationआंदोलन