शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पुराच्या धोक्याने सांगली कारागृहातील ८० कैद्यांचे कळंबा कारागृहात स्थलांतर

By घनशाम नवाथे | Updated: July 26, 2024 15:22 IST

२०१९ मध्ये कारागृहात महापुराचे पाणी आल्यानंतर दोन कैदी पळाल्याचा प्रकार घडला होता

सांगली : धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि धरणातील विसर्ग यामुळे सांगलीतील पाण्याची पातळी वाढली आहे. काही भागांत पुराचे पाणी शिरले आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा कारागृहातील कैद्यांचे स्थलांतर सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी ८० कैद्यांचे कळंबा कारागृहात स्थलांतर केले. त्यानंतर शुक्रवारीदेखील कैद्यांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू होती.जिल्ह्यात २००५, २०१९ आणि २०२१ च्या महापुराच्या काळात कारागृहातील कैद्यांचे स्थलांतर करण्यात आले होते. यंदाही पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे कारागृह प्रशासनाने सुरक्षिततेसाठी कैद्यांचे स्थलांतर करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी घेतली आहे. गुरुवारी ८० कैद्यांचे कळंबा कारागृहात स्थलांतर करण्यात आले आहे. त्यानंतर शुक्रवारीदेखील आणखी काही कैद्यांचे स्थलांतर करण्याबाबत हालचाली सुरू होत्या.२०१९ मध्ये कारागृहात महापुराचे पाणी आल्यानंतर दोन कैदी पळाल्याचा प्रकार घडला होता. कैद्यांच्या सुरक्षिततेसाठी कारागृह प्रशासनाने यंदा लवकरच हालचाली करत पहिल्या टप्प्यात ८० कैदी कळंबा कारागृहात स्थलांतरित केले. उर्वरित कैदी स्थलांतराची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. स्थलांतर करण्यात येत असलेल्या कैद्यांमध्ये गंभीर गुन्ह्यातील कैद्यांचा समावेश आहे. पुराचे पाणी जास्तच वाढल्यास सर्वच कैद्यांना स्थलांतरित करावे लागेल, असेही सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरPrisonतुरुंगfloodपूर