शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

राज्यभरातील ७५ नद्यांना 'अमृत वाहिनी' बनविण्याचा प्रयत्न, सांगली जिल्ह्यातील तीन नद्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 1:51 PM

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात ‘चला, जाणूया नदीला’ महोत्सव साजरा होणार

सांगली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात ‘चला, जाणूया नदीला’ महोत्सव साजरा होणार आहे. गांधी जयंतीपासून सुरुवात होईल. याद्वारे राज्यभरातील ७५ नद्यांना अमृत वाहिनी बनविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील अग्रणी, महाकाली आणि येरळा नद्यांचा त्यात समावेश आहे.बुधवारी मंत्रालयात वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नदी महोत्सवाचा निर्णय झाला. पहिल्या टप्प्यात २६ जानेवारी २०२३ पर्यंत ७५ नद्यांची यात्रा काढण्यात येईल. नदीच्या सद्यस्थितीची माहिती संकलित केली जाईल. त्यांच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार केला जाईल. नदीसंबंधी काम करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. नद्या प्रदूषणविरहित आणि बारमाही वाहत्या बनविण्यासाठी आराखडा तयार केला जाणार आहे.यात्रेत प्रत्येक नदीच्या ठिकाणी किमान १०० ते १५० संवर्धक, अभ्यासक एकत्र येतील. नद्यांची सध्याची प्रदूषण स्थिती, वाळू उपसा, अतिक्रमणे, सोडले जाणारे सांडपाणी, पूल व अन्य बांधकामे याच्या नोंदी घेतल्या जातील. नदीचे मूळ जलस्रोत, पुनरुज्जीवनासाठी राबविता येणारे उपक्रम यांचे आराखडे तयार केले जातील. स्थानिक गावकऱ्यांना सहभागासाठी उद्युक्त केले जाईल. आजवर पुनरुज्जीवीत केलेल्या नद्यांना मॉडेल स्वरुपात समोर ठेवले जाईल. त्यासाठी प्रयत्न केलेले कार्यकर्ते व संस्थांची मदत घेतली जाईल. हा संपूर्ण अहवाल शासनासमोर मांडला जाईल. त्यानंतर शासनाकडून पुनरुज्जीवनासाठी निधी मिळण्याची अपेक्षा आहे.

जिल्ह्यातील तीन नद्या

नदी महोत्सवात अग्रणी, येरळा व महाकाली यांचाही समावेश आहे. यातील अग्रणी नदीचे पुनरुज्जीवन जलबिरादरीने केले आहे. तिला मॉडेल स्वरूपात समोर ठेवून काम केले जाणार आहे. तीनही नद्या बारमाही वाहत्या केल्या जातील. येत्या ऑक्टोबरअखेर किंवा नोव्हेंबरमध्ये या नद्यांवर महोत्सव साजरा होणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीriverनदीpollutionप्रदूषण