शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

चौदाशे किमी सायकल प्रवासात आष्ट्यातील युवकांचा पर्यावरण जागर, भिलवडी-आष्टा-कन्याकुमारी चौदा जणांची शांतता रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 16:39 IST

वयाच्या साठीनंतरही सायकल प्रवास

सुरेंद्र शिराळकरआष्टा : आष्टा (ता.वाळवा) येथील युवकांनी भिलवडी-आष्टा ते कन्याकुमारी सायकलवरून प्रवास सुरू केला आहे. सुमारे १४ युवक १४०० किलोमीटर सायकलवरून प्रवास करीत शांतता, व्यसनमुक्ती तसेच बेटी पढाओ बेटी बचाओ तसेच वृक्षवल्ली आम्हा सोयरे, निसर्गाचा समतोल राखण्याचा संदेश देत आहेत.आष्टा शहरातील अनेक युवक सायकलींवरून नियमितपणे सुमारे पंधरा ते वीस किलोमीटर व्यायाम करतात. या सायकलप्रेमी युवकांपैकी अमोल पाटील, अमोल चौगुले, प्रकाश उर्फ छोटू लिगाडे, परशुराम मदने, लक्ष्मण माळी, सचिन चौगुले, शुभम सरडे, संदीप खोत (मिरजवाडी), सुबोध वाळवेकर, बाहुबली चौगुले (भिलवडी), सुहास सूर्यवंशी (पलूस), महावीर वसगडेकर (मिरज), जितेंद्र शेट्टी (अंकली), दीपक पाटील, सुहास सूर्यवंशी यांनी भिलवडी-आष्टा ते कन्याकुमारी असा सायकलवरून प्रवास करण्याचे निश्चित केले. त्यांना उद्योगपती गिरीश चितळे, राजू चौगुले, अमोल पाटील, डॉ. अरुण सरडे, निनाद माळी यांचे सहकार्य लाभले.आष्टा येथील अंबाबाई मंदिरानजीक सांगली जिल्हा नशाबंदी मंडळाचे संघटक समीर गायकवाड, डॉ. अरुण सरडे, शंकर मोहिते, रवींद्र चौगुले, निनाद माळी, प्रदीप पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. पहिल्या दिवशी सुमारे १५५ किमी व दुसऱ्या दिवशी १४५ किमी प्रवास केला. हे युवक कन्याकुमारीपर्यंत चौदाशे किलोमीटर प्रवास करणार आहेत. या प्रवासात सामाजिक शांततेचा संदेश देण्याबरोबर बेटी पढाओ, बेटी बचाओ, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, निसर्गाचा समतोल राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सायकलप्रेमी युवकांनी सुरू केलेला हा उपक्रम युवा पिढीला मार्गदर्शक ठरणारा आहे.वयाच्या साठीनंतरही सायकल प्रवासडॉ अरुण सरडे यांनी वयाच्या साठीनंतरही सायकल प्रवास सुरू ठेवला असून, त्यांनी नुकताच सप्टेंबरमध्ये जम्मू ते कन्याकुमारी असा प्रवास करीत आदर्श घालून दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीCyclingसायकलिंगenvironmentपर्यावरण