शहरं
Join us  
Trending Stories
1
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
2
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
3
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
4
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
5
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
6
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
7
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
8
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
9
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
10
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
11
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
12
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
13
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
14
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
15
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
17
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
18
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
19
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
20
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...

...अखेर कोयनेतून पाणी सोडणार, पण १०५० क्युसेकनेच; सांगलीत पाणी पोहोचण्यासाठी तीन दिवस लागणार 

By अशोक डोंबाळे | Published: October 27, 2023 12:29 PM

शेतकऱ्यांची गतीने पाणी सोडण्याची मागणी

सांगली : कऱ्हाड ते सांगलीपर्यंत कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. या आंदोलनाची दखल घेऊन शुक्रवार दि. २७ ऑक्टोबरपासून दुपारी १ वाजेपासून कोयना धरणातून एक हजार ५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. पण, पाणी कमी गतीने सोडल्यामुळे सांगलीत पाणी पोहोचण्यास तीन दिवस लागणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्याची मागणी केली आहे.पाऊस कमी झाल्यामुळे कृष्णा नदी ऑक्टोबर महिन्यातच कोरडी पडली आहे. शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला होता. प्रशासनाच्या चुकीमुळे कृष्णा काटच्या शेतकऱ्यांना पाणीटंचाईला सामाेरे जावे लागले होते. या गंभीर प्रश्नावर आमदार अरुण लाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गुरुवारीच आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. या आंदोलनाची दखल घेऊन कोयना धरणातून शुक्रवारी दुपारी १ वाजेपासून कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे एक युनिट सुरू केले आहे.या युनिटमधून एक हजार ५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. यामुळे कृष्णा नदी प्रवाहित होण्यास मदत होणार आहे. पण, कमी गतीने पाणी सोडल्यामुळे सांगलीत पाणी येण्यास किमान तीन दिवस लागणार आहेत. म्हणून शेतकऱ्यानी कोयना धरणातून किमान दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

विसर्ग वाढविणार : ज्योती देवकरकोयना धरणातून दुपारी १ वाजलेपासून एक हजार ५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. यामुळे सांगलीत पाणी पोहोचण्यासाठी तीन दिवस लागणार आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाई लक्षात घेऊन कोयनेतून विसर्ग वाढविण्याची विनंती धरण व्यवस्थापनाकडे केली आहे. त्यानुसार कोयना धरणातून दुपारनंतर आणखी विसर्ग वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीriverनदीWaterपाणीKoyana Damकोयना धरण