शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गतवर्षी जादा पाऊस, तरीही यंदा सांगलीत पाणीटंचाईचे ढग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 12:21 IST

३८३ गावांत उपाययोजनांची गरज

सांगली : गतवर्षी पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा तब्बल १६४ टक्के जादा पावसाची नोंद झाली, तरीही यंदा टंचाईचे ढग घोंगावू लागले आहेत. जिल्हा परिषदेने तयार केलेल्या टंचाई आराखड्यानुसार निम्मा जिल्हा टंचाईच्या छायेखाली आहे.७०० पैकी ३८३ गावांत टंचाईच्या उपाययोजना करावी लागू शकतात असा जिल्हा परिषदेचा अंदाज आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ५९ कोटी रुपयांचा टंचाई निवारण आराखडा तयार केला आहे. टँकरने तसेच, विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव आहे. २०२३ मध्ये ३२ टक्के पाऊस कमी झाल्याने डिसेंबरपासूनच जतमध्ये टंचाई स्थिती होती. एप्रिल-मे २०२४ मध्ये सुमारे १०० हून अधिक टँकरने जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि तासगाव या तालुक्यांत पाणीपुरवठा करावा लागला होता.गतवर्षी जतमध्ये १३० टक्के, खानापूरमध्ये १४० टक्के आणि कडेगावमध्ये १४३ टक्के पाऊस झाला. अन्य तालुक्यांत १७५ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला. त्यामुळे कोयना धरणात सध्या ७८.३८ टीएमसी, तर वारणा धरणात २५.३१ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात टंचाई स्थिती निर्माण झाल्यास धरणांतून पाणीपुरवठा होऊ शकतो. सध्या जतमध्ये सर्वांत कमी म्हणजे २९ टक्के पाणीसाठा आहे. तेथे मार्चपर्यंत टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या सुमारास शिराळा, मिरज, खानापूर, कडेगावमध्ये टंचाई वाढण्याचा अंदाज आहे.

मार्चअखेर पाणीपुरवठ्यासाठी १५५ गावांना ७२ टँकर तसेच ११९ विहिरी अधिग्रहित कराव्या लागू शकतात. ऐन उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल ते जूनअखेर ही संख्या वाढून ३८३ गावांना १८७ टँकर आणि २३४ विहीर अधिग्रहित करून पाणी द्यावे लागण्याची चिन्हे आहेत. यासाठी सुमारे पावणेतेरा कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सिंचन योजना सुरू कराव्या लागल्यास वीजबिलांपोटी ३० कोटी रुपयांचा खर्च गृहीत धरला आहे.

जतमध्ये सर्वाधिक होरपळएप्रिल ते जूनमधील सर्वाधिक होरपळ जत तालुक्यात होण्याची चिन्हे आहेत. ८७ गावांना टँकरची गरज भासू शकते. मिरजेत ३८, खानापुरात ११, शिराळा आणि आटपाडीत प्रत्येकी ७, कडेगावमध्ये पाच, तर कवठेमहांकाळ आणि तासगावमध्ये प्रत्येकी एका गावाला टँकरची गरज लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी