शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
2
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
3
जीवघेणं 'टायमिंग'! पतीशी भेट शेवटची ठरली; 'त्या' गोड बातमीचा आनंद अपघाताने हिरावला
4
"ओवेसींच्या पायजम्याची साइज टिंगूपेक्षा मोठी’’, इम्तियाज जलील यांची नितेश राणेंवर टीका  
5
मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती
6
IND vs BAN 2nd Test; India's Probable Playing XI : लोकेश राहुलसह बुमराह 'आउट'; या दोघांना मिळू शकते संधी
7
१११ वर्षांनी पितृपक्षात शुभ योग: ६ राशींना सर्वोत्तम, लाभच लाभ; नशिबाची साथ, भाग्याचा काळ!
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
9
पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत
10
MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश: कृषी सेवेतील पदांचा समावेश करत पूर्व परीक्षेची नवी तारीख आयोगाकडून जाहीर
11
MobiKwik IPO: ₹७००००००००० उभारण्याची तयारी; मोबिक्विकच्या आयपीओला सेबीचा हिरवा झेंडा
12
थरकाप उडवणारं हत्याकांड! कोण होती महालक्ष्मी?, जिचं मुंडकं फ्रीजमध्ये सापडलं
13
Success Story: पुण्यात जन्म, भारतात यश मिळालं नाही; अमेरिकेची वाट धरली, आता आहेत ६४,३२५ कोटींचे मालक
14
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
15
प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी
16
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
17
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
18
अधिकाऱ्यांच्या असहकारावरून मुनगंटीवार ‘कॅबिनेट’मध्ये भडकले
19
राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर; धान उत्पादकांना चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर
20
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध

फडणवीस, सदाभाऊंचा संप मोडण्याचा डाव...

By admin | Published: June 04, 2017 1:15 AM

पाटील, औंधकर : इस्लामपुरात प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : शेतकऱ्यांचा संप मोडून काढण्याचे षड्यंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रचल्याचा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर यांनी शनिवारी केला. शासनाच्या कृषी प्रदर्शनाचे ठेके घेणारा आरएसएसचा व सदाभाऊंचा हस्तक संदीप गिड्डे व जयाजी सूर्यवंशी यांना शेतकऱ्यांच्या कोअर कमिटीत घुसवून शेतकऱ्यांचे आंदोलन ‘हायजॅक’करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री व खोत यांनी केल्याचा आरोपही त्यांनी केला.पेठ-सांगली रस्त्यावरील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाच्या पश्चिमेस असणाऱ्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रवेशद्वारावर सकाळी बळीराजा संघटना व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, स्वामिनाथन आयोग लागू करा, अशा घोषणा दिल्या. शेतकऱ्यांचा संप मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मुख्यमंत्री व कृषी राज्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांना जोडे मारून त्यांचे दहन केले. बी. जी. पाटील, सुयोग औंधकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनावेळी सचिन थोरबोले, सुधीर कदम, अमोल चव्हाण, अशोक सलगर, आबासाहेब काळे, गणेश काळे उपस्थित होते. शेतकऱ्यांनी संप मागे घेतला, अशी खोटी व फसवी घोषणा शासन करीत आहे, मात्र संप अजूनही सुरूच राहणार आहे. शेतकऱ्यांनी या खोट्या प्रचाराला बळी न पडता सावध रहावे, असे आवाहन पाटील व औंधकर यांनी केले.त्यानंतर पत्रकार बैठकीत पाटील म्हणाले की, फडणवीस आणि खोत यांनी संदीप गिड्डे व जयाजी सूर्यवंशी यांना हाताश्ी धरून कोअर कमिटी बैठकीवेळी काय बोलायचे, कशी भूमिका घ्यायची, याची प्राथमिक बोलणी करत पुणतांबा येथील आंदोलनस्थळी पाठविले. त्यानुसार या दोघांनी मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या शेतकऱ्यांच्या कोअर कमिटीचा आणि बैठकीचा ताबा घेतला. बैठकीत गिड्डे व सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांच्या मूळ मागण्यांना बगल देत चर्चा घडवली. यावेळी शेतकरी प्रतिनिधी बैठकीतून बाहेर निघून गेले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या ७० टक्के मागण्या मान्य केल्याच्या मुद्द्याशी सहमत व्हायला कोअर कमिटीला भाग पाडले. हा तपशील गिड्डे याने सोशल मीडियावर पोस्ट करून शेतकऱ्यांचा संप मागे घेण्यात आल्याची कोल्हेकुई सुरू केली.पाटील म्हणाले की, फडणवीस आणि खोत यांच्या शेतकरी संप मोडीत काढण्याच्या कृत्याची सखोल चौकशी व्हावी तसेच शेतकरीविरोधी भूमिका घेणाऱ्या गिड्डे व सूर्यवंशी यांच्या संपत्तीची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. शेतकऱ्यांकडून समोर आलेल्या सर्व मागण्या न्याय्य आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सरसकट कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आवश्यक आहे.विशेष अधिवेशन बोलवाबी. जी. पाटील म्हणाले की, राज्यात अराजकता माजण्यापूर्वी शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एक दिवसाचे अधिवेशन घ्यावे. हे अधिवेशन राज्यातील शेतकरी व जनतेसाठी खुले ठेवून मुख्यमंत्री, मंत्री व २८८ आमदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींबाबत काय बोलतात, हे कानाने ऐकता आणि डोळ्यांनी पाहता येईल. कर्जमाफीबाबत कोणाची काय भूमिका आहे, हे स्पष्ट होईल. त्यासाठी कोणाच्या मध्यस्थीची गरज भासणार नाही.