शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

घोलेश्वरमधील शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:30 AM

लोकमत न्यूज नेटवर्क संख : म्हैसाळ उपसा योजनेच्या सहाव्या टप्प्यात घोलेश्वर (ता. जत) येथील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

संख : म्हैसाळ उपसा योजनेच्या सहाव्या टप्प्यात घोलेश्वर (ता. जत) येथील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. या शेतकऱ्यांनी गेल्या तेरा वर्षांपासून मोबदल्यासाठी लढा दिला आहे. तरीही त्यांना जमिनीचा मोबदला शासनाकडून मिळाला नाही, तो त्वरित मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार विक्रम सावंत यांच्याकडे केली. या मागण्याचे निवेदन जलसंपदामंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडेही दिले आहे..

निवेदनात म्हटले की, म्हैसाळ सहावा टप्पा मुख्य कालव्याअंतर्गत घोलेश्वर येथील शेतकऱ्यांची शेत जमीन मुख्य कालव्यासाठी २००९ मध्ये अधिग्रहण केलेली आहे. आज अखेर शेतकऱ्यांना कालव्यामध्ये गेलेल्या जमिनीचा लाभ मिळाला नाही. याबाबत पाटबंधारे विभागाला वारंवार लेखी, तोंडी, प्रत्यक्ष संबंधित अधिकाऱ्यांना भेटून मागणी केली आहे.

पाटबंधारे अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्याबरोबर प्रत्यक्ष बैठका घेऊन चर्चाही करण्यात आलेली आहे. तरीसुद्धा आज अखेर शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही.

संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. मोबदला तर मिळाला नाहीच. उलट सोडलेल्या पाण्यातून शेतीचे नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित मोबदला मिळावा, अन्यथा शेतकरी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा, अल्पसंख्याक कल्याण समितीचे जिल्हा सदस्य, शेतकरी सलीम गवंडी यांनी दिला आहे.