शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

आनंदवार्ता! सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे ३५ कोटी रुपये मिळाले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 4:28 PM

उर्वरित निधी लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार

सांगली : गेल्यावर्षी अर्थात डिसेंबर २०२१ मध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्षांसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे पूर्ण करून त्याचा अहवाल संबंधित विभागाकडे दिला होता. या पावसामुळे जिल्ह्यातील ३९ हजार ७४५ शेतकऱ्यांची पिके बाधित झाली होती. या पिकांची नुकसान भरपाई जिल्हा प्रशासनाकडे आली असून, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ३५ कोटी २१ लाख २० हजार रुपये जमा केले आहेत.

जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी पुरता हतबल झाला होता. या दरम्यान, ३८४ गावांतील पिके बाधित झाली होती. सुमारे २१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी तातडीने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कृषी विभागासह अन्य संबंधित विभागाने पंचनामे पूर्ण केले.

पंचनामे पूर्ण केल्यानंतर त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे दिला होता. ३९ हजार ७४५ शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची जिल्ह्यासाठी ३८ कोटी १ लाख ७ हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे आली आहे. या निधीपैकी ३५ कोटी २१ लाख २० हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. उर्वरित निधी लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती विभागाकडून देण्यात आली.

तालुकानिहाय गतवर्षी झालेल्या पिकाची नुकसान भरपाई वाटप

तालुका प्राप्त निधी शेतकऱ्यांना वाटप निधी
मिरज९ कोटी ६१ लाख९ कोटी ५६ लाख
तासगाव१३ कोटी १९ लाख१२ कोटी ५७ लाख
वाळवा५ लाख ९२ हजार५ लाख ९० हजार
शिराळा५५ हजार५५ हजार
पलूस३ कोटी ३५ लाख३ कोटी १३ लाख
कडेगाव१ लाख ९१ हजार१ लाख ९१ हजार
खानापूर३ लाख ३० हजार३ लाख ३० हजार
आटपाडी६ लाख ६० हजार६ लाख ३० हजार
कवठेमहांकाळ२ कोटी ८३ लाख२ कोटी ७१ लाख
जत६ कोटी ९६ लाख५ कोटी ७२ लाख
एकूण३८ कोटी १ लाख३५ कोटी २१ लाख
टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी