शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही

By admin | Published: March 05, 2016 12:22 AM

चंद्रकांत पाटील : संख येथील बैठकीत चारा, पाणी टंचाईचा आढावा

संख : शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे राहणार आहे. वेळप्रसंगी कर्ज काढावे लागले तरी चालेल, पण शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.संख (ता. जत) येथे ते आढावा बैठकीत बोलत होते. आढावा बैठकीमध्ये पाणी टंचाई, चारा टंचाई, म्हैसाळ योजनेचा आढावा घेतला. पाणी टंचाईचा आढावा तहसीलदार अभिजित पाटील, गटविकास अधिकारी ओमराज गव्हाणे, उपविभागीय अधिकारी कांबळे यांनी, तर म्हैसाळ योजनेचा आढावा कार्यकारी अभियंता सचिन पवार यांनी घेतला. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी उत्पन्न समितीच्या आवारात गोदाम, कोल्ड स्टोअरेज बांधणार आहोत. तसेच मागेल त्याला टॅँकर दिले जाणार आहेत. म्हैसाळ योजनेसाठी निधी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी पूर्व भागातील ओढापात्रात सोडण्यासाठी २०० कोटी रुपयांची गरज आहे. ते पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून या ठिकाणी जनावरांना चारा छावणीची मागणी केली. तसेच जनावरांना छावणी सुरू करण्यासाठी चारा डेपो किंवा छावण्या सुरू केल्या जातील. खा. संजय पाटील यांनी, २०० कोटी रुपये म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी देऊन ८० गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे सांगितले. आ. विलासराव जगताप म्हणाले की, म्हैसाळ योजनेसाठी २०० कोटी निधी द्यावा, तालुका विभाजन करावे, तालुक्यासाठी पूर्व भागात एक अतिरिक्त तहसीलदार देण्याची मागणी केली आहे. यावेळी आ. सुरेश खाडे, माजी आ. पृथ्वीराज देशमुख, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, प्रांताधिकारी अशोक पाटील, माजी सभापती आर. के. पाटील, राजेंद्र कन्नुरे, डॉ. रवींद्र आरळी उपस्थित होते. (वार्ताहर)शेतकऱ्यांच्या सूचना स्वीकारणारसध्या जो शेतकऱ्यांच्या सुविधांवर बोलतो तो नेता आणि जो शेतकऱ्यांच्या सवयीवर बोलतो तो शत्रू, असे मानण्याची पध्दत वाढली आहे. तुम्ही सूचना करा, त्या स्वीकारल्या जातील असे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.