शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: राज्यात एक दिवसाचा दुखवटा; NCPA मध्ये घेता येणार रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
2
Ratan Tata : रतन टाटांनी देशासाठी एवढे केले, जे कुणालाही जमणार नाही; सच्चा देशभक्ताच्या या दहा गोष्टी...
3
"हे टाटाच्या डीएनएमध्ये आहे...!" रतन टाटा यांची इच्छा, चेअरमन पद; लोकांना देत होते केवळ एकच सल्ला!
4
"मोदी महान आहेत, ते वडिलांसारखे दिसतात"; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक
5
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर; कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत
6
Ratan Tata News : "थँक यू फॉर..." आणि 'ती' ठरली रतन टाटांची अखेरची पोस्ट
7
Ratan Tata Successor: रतन टाटांचा उत्तराधिकारी कोण होणार? अब्जावधींचे साम्राज्य कोण सांभाळणार, ही नावे चर्चेत...
8
"मी का त्याची आठवण काढेन", सलमान खानचं नाव ऐकताच असं का म्हणाली युलिया वंतूर?
9
Ratan Tata : दानशूर! त्सुनामी असो किंवा कोरोनाचा उद्रेक... प्रत्येक संकटात मदत करण्यात रतन टाटा आघाडीवर
10
"एखाद्याला निरोप देताना आपण सहज “टा-टा” म्हणतो, पण तुम्हाला...", रतन टाटा यांच्या निधनानंतर कुशल बद्रिकेची पोस्ट
11
"माझ्यातली पोकळी भरुन काढण्याच्या प्रयत्नात..."; टाटांसह सावली सारख्या असणाऱ्या शंतनूची भावूक पोस्ट
12
रतन टाटा यांच्या निधनावर अंबानी-अदानी यांनी व्यक्त केला शोक, आनंद महिंद्रा यांचीही आदरांजली
13
रतन टाटांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; सर्वसामान्यांना घेता येणार पार्थिवाचं अंत्यदर्शन
14
फोर्डने केलेला अपमान गिळून रतन टाटा भारतात परतलेले; काळाचे चक्र असे काही फिरले, ९ वर्षांनी... 
15
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
16
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
17
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
18
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
19
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
20
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर

बहुसंख्याकवादातून अल्पसंख्याक चिरडले जाण्याची भीती, सांगलीच्या नास्तिक परिषदेतील परिसंवादात वक्त्यांचा सूर

By अविनाश कोळी | Published: September 20, 2023 6:50 PM

धर्मापेक्षा विवेकी नास्तिक होणे हा चांगला पर्याय

सांगली : धर्म हे विषारी असून ते स्वत:चे व समाजाचेही नुकसान करीत आहे. बहुसंख्याकवादातून अल्पसंख्य चिरडले जाण्याचीही भीती असते. त्यामुळे धर्मापेक्षा विवेकी नास्तिक होणे हा चांगला पर्याय आहे, असा सूर सांगलीच्या नास्तिक परिषदेतील परिसंवादातून उमटला.नास्तिक परिषदेत ‘नास्तिकतेचे सामर्थ्य आणि मर्यादा’ या विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये तुषार गांधी, ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभेचे खासदार कुमार केतकर सहभागी झाले होते. डॉ. प्रदीप पाटील अध्यक्षस्थानी होते. शिवप्रसाद महाजन यांनी प्रास्ताविक केले. लोकेश शेवडे म्हणाले, अनेक जण आपण नास्तिक असल्याचे सांगतात; परंतु खरे नास्तिक कोण हे ओळखता येत नाही. काही जण धर्म-परधर्म, जात-परजात मानतात. कोणत्याही धर्मात परमेश्वर ही कल्पना असतेच. धर्म-परधर्म या पातळीवर न राहता ते परधर्मद्वेषांपर्यंत जातात. अशा ढोंगी लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. ते स्युडो नास्तिक असतात. नास्तिक बनण्याची प्रक्रिया सोपी नाही.

‘प्रसार माध्यमात नास्तिकतेची भूमिका’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर म्हणाले, नास्तिक बनणे ही प्रक्रिया आहे. आपण नकारात्मक नास्तिकता स्वीकारतो; पण नकारात्मक नास्तिकताही आस्तिकतेचे प्रतिबिंब असते. प्रसार माध्यमातून नास्तिकेचा प्रचार होत नाही. धर्म मात्र आपसूकपणे मांडले जातात. प्रसार माध्यमातून भगवद्गीता पठणच्या स्पर्धा घेतल्यात जातात. ही प्रवृत्ती आता वाढत चालली आहे.डॉ. प्रदीप पाटील म्हणाले, आपण नास्तिक बनण्यासाठी काय करावे लागेल, हे पाहिले पाहिजे. आपण नास्तिक बनल्यानंतर सर्व गोष्टींना नकार देत असतो. हा नकार देत असताना आपल्याजवळ पर्याय काय आहे, हेही महत्त्वाचे आहे. यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन व तार्किकता या गोष्टी आत्मसात करण्याची गरज आहे.

परिषदेत ‘बहुसंख्यावाद व धार्मिक हिंसाचाराला सामोरे जाताना’ या विषयावर तुषार गांधी, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, पर्यावरणवादी नेते विश्वंभर चौधरी यांनी मते व्यक्त केली. सूत्रसंचालन डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी केले.विश्वंभर चौधरी म्हणाले, चार्वाकापासून विवेकवादाला सुरुवात झाली. लोकशाहीमध्ये विवेकवादी होणे हे आव्हान आहे; परंतु विवेकवाद जोपासण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार केला पाहिजे. विज्ञानवाद वाढवत नेल्यास विवेकवाद वाढत जाईल; परंतु आपल्या समाजात विज्ञानवाद रुजविला गेला नाही. त्यामुळे भोंदूगिरी वाढत आहे. परंपरा व धर्माची चिकित्सा झाली पाहिजे.धर्माला मोकाट स्वातंत्र्य नाही : विश्वंभर चौधरी

आपल्या देशाची राज्यघटना श्रेष्ठ आहे. जगातल्या कोणत्याही राज्यघटनेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितलेला नाही. नागरिकाला धर्माचे स्वातंत्र्य आहे; परंतु कोणत्याही धर्माला मोकाट स्वातंत्र्य देण्यात आले नाही, असे मत विश्वंभर चौधरी यांनी मांडले.

टॅग्स :Sangliसांगली