शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

भोसेत दारूबंदीसाठी महिलांची वज्रमूठ

By admin | Published: July 05, 2017 12:15 AM

भोसेत दारूबंदीसाठी महिलांची वज्रमूठ

लोकमत न्यूज नेटवर्कमालगाव : एकीची वज्रमूठ बांधलेल्या भोसे (ता. मिरज) येथील रणरागिणींनी दारूची बाटली आडवी करण्याबरोबरच गावातून मटक्यासह अवैध व्यवसायही हद्दपार करण्याचा निर्धार मंगळवारी विशेष महिला ग्रामसभेत केला. दबावाला बळी न पडता हा लढा देण्याचाही निर्णय घेण्यात आला.भोसे येथे दारू व अवैध व्यवसाय बंदीसाठी सरपंच सुलाताई कट्टेकर यांच्या अध्यक्षतेखाली व उपसरपंच कमल पाटील, पोलिस पाटील शोभाताई कदम यांच्या उपस्थितीत विशेष महिला ग्रामसभा पार पडली. मनोज पाटील यांनी प्रास्ताविक केले. दारूबंदी व अवैध धंद्यांना विरोधासाठी महिलांची मते जाणून घेण्यात आली. कांचन कोळी यांनी, दारूमुळे आपले कुटुंब कसे उद्ध्वस्त झाले, याची कहानी कथन केली. तो त्रास इतर भगिनींच्या वाट्याला येऊ नये यासाठी गावात दारूबंदी आवश्यक आहे. आपण या लढ्याचे नेतृत्व करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कोळी यांच्यासोबत इतर त्रस्त महिलांनीही दारूबंदी करण्याचा निर्धार व्यक्त केला. दारूची बाटली आडवी करण्याबरोबरच गावातून अवैध व्यवसायही हद्दपार करण्याचा महिलांनी ग्रामसभेत निर्धार केला. या लढ्याचे नेतृत्व करण्यास पुढाकार घेण्याचे आश्वासन सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम, अनिता कदम, मनोज पाटील यांनी यावेळी दिले. या मोहिमेसाठी अकरा महिलांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती दारूबंदीसाठी गावात सह्यांची मोहीम राबविणार आहे. गावात परमिट रूमला नव्याने परवाना व नूतनीकरण करण्यात येऊ नये, परमिट रूमचे बांधकाम थांबविण्यात यावे, विनापरवाना बांधकाम पाडण्यात यावे, अशी मागणीही महिलांनी केली. परवान्याबाबत ग्रामविकास अधिकाऱ्यास जाबही विचारण्यात आला. यावेळी परवाना दिला नसल्याचा निर्वाळा अधिकाऱ्यांनी दिला.ग्रामसभेस ग्रामपंचायत सदस्य गौतम होवाळे, नेमिनाथ चौगुले, अमोल पाटील, प्रकाश चौगुले यांच्यासह दोनशेहून अधिक महिला उपस्थित होत्या....आणि तिला अश्रू अनावर झालेदारूमुळे उद्ध्वस्त झालेल्या संसाराची कहाणी मांडताना कमल माने या महिलेला अश्रू अनावर झाले. व्यसनाने पतीचे निधन झाले, दोन मुलेही व्यसनाधिन आहेत. याचा त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होण्याची वेळ आल्याने दारूबंदी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी अश्रू पुसत केल्याने महिलांचे डोळेही पाणावले.पोलिस हाजीर हो!शाळेजवळ भर चौकात अवैध देशी दारू विक्री व मटका व्यवसाय सुरू असताना, तो पोलिसांना का दिसत नाही, असा सवाल करीत, पोलिसांना सभेत बोलवा, अशी मागणी संतप्त महिलांनी केली. तेथे उपस्थित असलेले भोसे भागाचे हवालदार कांबळे यांना बोलाविण्यात आले. त्यांना जाब विचारला. हवालदार कांबळे यांनी, सर्व अवैध व्यवसाय तातडीने बंद करण्याचे आश्वासन दिले.