शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

सामान्य माणूस साहित्याचा केंद्रबिंदू हवा - श्रीपाल सबनीस

By admin | Published: January 28, 2017 9:16 PM

भूमिका कोणतीही असली तरी, सामान्य माणूस हा साहित्याचा केंद्रबिंदू असला पाहिजे, असे प्रतिपादन श्रीपाल सबनीस यांनी केले.

 
चरण (सांगली), दि. २८ -  वेगवेगळ्या प्रकारचे जातीसमूह या देशात आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकेतून चळवळी सुरू आहेत. भूमिका कोणतीही असली तरी, सामान्य माणूस हा साहित्याचा केंद्रबिंदू असला पाहिजे, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय 
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शनिवारी केले. पणुंब्रे वारुण (ता. शिराळा) येथे शिराळा तालुका शब्दरंग साहित्य मंडळाच्यावतीने आयोजित नवव्या डोंगरी साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
सबनीस म्हणाले की, अनेक प्रकारची संमेलने महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात होत आहेत. अशा क्षेत्रीय संमेलनांचा इतिहास लिहिण्याची गरज आहे. साहित्यिकांनी दलित, आदिवासी, डोंगरी अशा संमेलनांमधून समतेचा विचार प्रस्थापित केला पाहिजे. याचबरोबर आपल्या महापुरुषांना जातीय चौकटीत न मांडता अखिल मानवजातीच्या पातळीवर त्यांचे विचार पोहोचविले पाहिजेत. संमेलनाचे उद्घाटक माजी मंत्री आमदार जयंत पाटील म्हणाले की, साहित्यच माणसाला सुसंस्कृत बनविते. साहित्याच्या क्षेत्रातील माणसे आपल्या प्रतिभेने जगाच्या कानाकोपºयात पोहोचतात. साहित्यातून माणसाला विचार मिळतो, म्हणून साहित्यिकांना व साहित्य चळवळीला प्रतिष्ठा देण्याची गरज आहे. समाज सर्वार्थाने पुढे न्यायचा असेल, तर साहित्यिकांची नितांत गरज आहे. यावेळी साहित्य संमेलनाच्या आयोजक संस्थेस पन्नास हजार रुपये देणगी
देण्याचे पाटील यांनी जाहीर केले. माजी आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख, कवी प्रदीप पाटील यांनी मनोगत  व्यक्त केले. हणमंतराव पाटील यांनी स्वागत केले. शब्दरंग साहित्य मंडळाचे अध्यक्ष वसंत पाटील यांनी प्रास्ताविक केले.
संमेलनास प्रा. शामराव पाटील, प्रा. डॉ. डी. जी. कणसे, पी. वाय. पाटील, सरपंच विजय विभुते, उपसरपंच अंकुश पाटील, मुख्याध्यापक अमृतकुमार पांढरे, शिवाजी पाटील, डी. वाय. ढेरे, मोहन पाटील, बाजीराव शेंडगे, मनोज चिंचोलकर, तानाजी पाटील उपस्थित होते. नारायण घोडे यांनी आभार मानले.
(वार्ताहर)