शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
2
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
3
Irani Cup 2024 : ३ बळी! मुकेश कुमारनं मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावला; रहाणे-अय्यरवर मोठी जबाबदारी
4
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
5
"फडणवीसांपासून इतर सगळे नेते कूचकामी म्हणून...", संजय राऊतांचे अमित शाहांवर टीकेचे बाण
6
Nepal Floods : हाहाकार! नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे विध्वंस; मृतांची संख्या २१७ वर, १४३ जण जखमी
7
...तर 'बिग बॉस मराठी' होस्ट करताना दिसले असते शिवाजी साटम, म्हणाले- "मला महेशने..."
8
सर्वपित्री अमावास्या: ५ गोष्टी आवर्जून करा, पूर्वज वर्षभर राहतील प्रसन्न, देतील शुभाशीर्वाद!
9
Tata Steel News: टाटा स्टीलनं 'हा' प्रकल्प केला बंद, हजारो लोकांची नोकरी जाणार का?
10
नायर हॉस्पिटल-कॉलेजमधील विद्यार्थिनींची मनसेकडे धाव; लैंगिक छळाचा धक्कादायक आरोप
11
"सीनियर्सने ४८ तास उभं केलं, मैत्रिणीने अचानक..."; डॉक्टरच्या मृत्यूनंतर बहिणीचे गंभीर आरोप
12
IND vs BAN : अश्विननंतर पिक्चरमध्ये आला जड्डू; टीम इंडिया जोमात; बांगलादेश कोमात!
13
रवीना टंडनच्या विरोधात कोर्टाचे चौकशीचे आदेश, अभिनेत्रीवर धमकावल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
14
Chirag Paswan : "...तर मी एका मिनिटात मंत्रिपदाचा राजीनामा देईन"; चिराग पासवान यांचं मोठं विधान
15
अजित पवारांच्या पक्षाला मिळणार नवं चिन्ह?; सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी
16
UPI Payment : फोनमध्ये इंटरनेट नाहीये? टेन्शन कसलं! पाहा विना इंटरनेट कसं करू शकता UPI Payment
17
चतुर्ग्रही योगात नवरात्रारंभ: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, बँक बॅलन्स वाढ; प्रमोशन संधी, लाभच लाभ!
18
Navratri 2024: नवरात्र नऊ दिवसच का? घटस्थापना का करतात? नवरात्रीची उपासना कोणती? वाचा!
19
तनुश्री दत्ता गेल्या सहा वर्षांपासून आहे बेरोजगार; म्हणाली, "Me Too मधील आरोपींनीच..."
20
स्वत: पाकिस्तानी, बायको बांगलादेशी; 'हिंदू' आडनाव लावून गेली १० वर्ष भारतात वास्तव्य

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ग्रामीण भागातही साहित्य संमेलन होणं गरजेचं - आप्पासाहेब खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2022 3:28 PM

मराठी भाषेचे पहिले विद्यापीठ मुबई येथे उभे करणार असून त्यासाठी मुबई महानगरपालिकाने जागा दिली आहे.

 देवराष्टे - ग्रामीण भागात साहित्य संमेलन होणे ही काळाची गरज आहे त्यातूनच  लिहा त्यांना बळ मिळेल मराठी भाषेचे संवर्धन हे समाजात जनजागृती होऊन नवीन पिढी घडेल यासाठी गावोगावी साहित्य संमेलन भरले पाहिजेत असे मत 32 व्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अप्पासाहेब खोत  यांनी व्यक्त केले.

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर व ग्रामपंचायत देवराष्टे यांच्या संयुक्त विद्यमाने 32 वे दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन देवराष्टे येथील श्री यशवंतराव चव्हाण सास्कृतीक भवन येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष  लक्ष्मकांत देशमुख, स्वागताध्यक्ष विश्वजित कदम मान्यवर  उपस्थित होते. यावेळी बोलताना आप्पासाहेब खोत यांनी विविध विषयांवर मार्गदर्शक केले मराठी ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी प्रयत्न केले होते अनेक साहित्यिकांनी मराठी साहित्य मध्ये मोलाची भर घातली असून ही परंपरा पुढे चालू राहिली पाहिजे. ग्रामीण जीवन एका नव्या वळणावर उभा राहिले आहे  त्यामध्ये राजकारण ,समाजकारण, बदलते जीवन शैली, दारिद्र्य ,याचा सहभाग असावा आजचा युवक टीव्ही, मोबाईल ,राजकारण यात अडकून पडला आहे काही ठीकाणी पर्याय नाही म्हणुन शेती मध्ये अडकून पडला आहे या सर्व विषयांवर नवोदित लेखकांनी त्यांनी लिखाण केले पाहिजे 

 शासनाने सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा केला पाहिजे तरच भाषेची व भाषेबरोबर संस्कृती जतन होईल माणसातील लेखक जिवंत राहिला पाहिजे यासाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेऊन साहित्य संमेलने ,संवाद ,चर्चासत्रे घेतली पाहिजे फक्त मराठी भाषेत एच कथाकथन सांगितले जात त्यामुळे ही कला मी कायम जपणार आहे मरेपर्यंत कथाकथनकार ही बिरुदावली ही अभिमानाने छातीवर मिरवणार आहे 

शेवटी त्यांनी एक काव्य सादर केले 

मी भरून घेतो सारे,हृदयाच्या काठोकाठ ,पण शब्दातून देताना का ,पाझरता होतो माठ,

शब्दातून देऊन थोडे जी उरात उरते काही ती प्रेरक शक्ती तुम्हाला मी मजला जगण्याची देते ग्वाही

यावेळी संमेलनाचे उद्घाटक लक्ष्मकांत देशमुख यांनी देखील देशातील विविध ग्रथ,पुस्तकावर मार्गदर्शन केले यावेळी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे ,डॉक्टर विनोद कांबळे डॉक्टर चंद्रकांत पोतदार ,प्राध्यापक एकनाथ पाटील, दी बा पाटील , भीमराव धुळूबुळू ,वी द कदम, सरपंच प्रकाश मोरे ,उपसरपंच सुभाष शिरतोडे ,तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप जाधव ,हिंमत पाटील ,स्वाती पवार सह मान्यवर उपस्थित होते.

राज्यात पहिले मराठी भाषेचे विद्यापीठ उभे राहणार - विश्वजीत कदम 

मराठी भाषेचे पहिले विद्यापीठ मुबई येथे उभे करणार असून त्यासाठी मुबई महानगरपालिकाने जागा दिली आहे. या भव्य विदयापिठासाठी अर्थसंकल्प मध्ये निधी ची तरतुद केली आहे त्यामुळे राज्यात पहिले मराठी भाषेचे विद्यापीठ उभे राहणार असल्याचे राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केले तसेच कोल्हापुर येथे मराठी भवन उभा करणेसाठी डी पी डी सी मधुन पंचवीस लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले

ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरवात 

यशवंतराव चव्हाण जन्मस्थळ ते संम्मेलन स्थळ अशी ग्रंथदिंडी काढण्यात आली. यशवंतराव चव्हाण यांच्या पुस्तकांचा ग्रंथदिडीत समावेश करण्यात आला होता. यावेळी साहित्यीक, विद्यार्थी , ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते. ग्रंथदिडीत झांजपथक , भजणीमंडळ सहभागी झाले होते.