शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
2
"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले
3
आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या,अन्यथा आगामी निवडणुकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे
4
धक्कादायक! टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव, पगार कापण्याची धमकी; मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल
5
"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
6
पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
7
स्वत:शीच लग्न करणाऱ्या जगप्रसिद्ध रिलस्टारने संपविले आयुष्य; चिठ्ठी सापडली
8
पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?
9
पितृपक्ष: सर्वपित्री अमावास्येला ‘असे’ करा श्राद्ध; पूर्वज होतील प्रसन्न, समाधानाने तृप्त!
10
दुसऱ्या लग्नातही सुख नाही, नव्या नवरीनं उचललं टोकाचं पाऊल; पती फोनवर असं काय बोलला?
11
सुपर कॅच! सिराज अगदी स्प्रिंगसारखा वाकला; शेवटच्या टप्प्यात शाकिबचा 'करेक्ट कार्यक्रम'
12
फिट राहा! २ वेळा भात खाल्ल्याने वजन वाढतं?; दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात खावा, जाणून घ्या
13
IND vs BAN : 'हिटमॅन' रोहित झाला 'सुपरमॅन'; हवेत उडी मारुन एका हातात पकडला कॅच (VIDEO)
14
वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..."
15
SBI ची सुपरहिट स्कीम : एकदा करा डिपॉझिट, दर महिन्याला होईल कमाई; पाहा संपूर्ण डिटेल्स
16
नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल!
17
लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं
18
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
19
पाकिस्तानला मोठा झटका! ६ मंत्रालयांना टाळे, दीड लाख नोकऱ्या गेल्या; आयएमएफकडून कर्जासाठी लोटांगण
20
Nepal Flood : पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: पैशाला हात लावत नाहीत; पण..; माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळेंचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 4:10 PM

आघाडी सरकारने विधान परिषदेच्या तोंडावर आमदार शांत करण्यासाठी आलिशान हाॅटेलमध्ये ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला.

सांगली : देशात पहिले आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: पैशालाही हात लावत नाहीत; पण सचिन वाझे, यशवंत जाधव यांनी माया गोळा करताना त्यांनी डोळे झाकले होते, अशी टीका बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी शुक्रवारी केली. आघाडी सरकारने विधान परिषदेच्या तोंडावर आमदार शांत करण्यासाठी आलिशान हाॅटेलमध्ये ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला.

बहुजन रयत परिषदेच्या नवनिर्धार संवाद अभियानासाठी ढोबळे सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाआघाडी सरकारने अण्णा भाऊ साठे महामंडळासह विविध महामंडळांना साडेतीन हजार कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली; पण दीड महिन्यात अध्यादेश काढला नाही. या महामंडळांना एक रुपयाही आलेला नाही.

बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे काही मागण्या केल्या आहेत. मातंग, ढोर, मोची, होलार, चांभार, धनगर समाजाच्या विकासासाठी कृतिशील आराखडा तयार करावा, अ, ब, क, ड प्रवर्ग लागू करून समाजाला न्याय द्यावा, लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या शिफारशी तत्काळ लागू कराव्यात, साकरे आयोगाच्या शिफारशीनुसार मातंग समाजाला न्याय द्यावा, पदोन्नतीचा अध्यादेश रद्द करावा, आदी मागण्यांबाबत सरकारकडून कोणताच निर्णय झालेला नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे, महिला आघाडी अध्यक्षा कोमल साळुंखे यांची उपस्थिती होती.

बहुजन समाजासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही

राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यांचे जाहीरनामे वेगळे आहेत. त्यांच्यात ताळमेळ नाही. राज्यसभेला गोंधळ झाला, तसा होऊ नये यासाठी आमदारांना आलिशान हाॅटेलमध्ये ठेवले आहे. राज्यातील शेतकरी, बहुजन समाज मात्र समस्यांनी ग्रासला आहे. त्याकडे लक्ष देण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नाही.

टॅग्स :SangliसांगलीUddhav Thackerayउद्धव ठाकरे