शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

उन्हाळी सोयाबीन प्रकरणात सरकारकडून फसवणूक, माजी खासदार राजू शेट्टींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 2:32 PM

सत्तेत असणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्रस्तर व राज्यस्तरावर वारंवार वेगवेगळ्या भूमिका घेत असते. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करीत असल्याचा दिखावा करीत असले तरी त्यांची धोरणे शेतकरी हिताविरोधी आहेत.

भिलवडी : महाबीज ही सरकारची कंपनी आहे. शेतकऱ्यांना उन्हाळी बियाणे प्लॉटचे आमिष दाखवून लागवड करण्यास भाग पाडले. त्याला पीक लागत नसल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. सोयाबीनच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांना फसविले असून ते कृषी मंत्रालयाचे अपयश असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

भिलवडी (ता. पलूस) येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपटराव मोरे, कार्याध्यक्ष संदीप राजोबा, बाळासाहेब मगदूम, धन्यकुमार पाटील, रोहित पाटील आदी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले की, मायनर इरिगेशन विभागाची जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सुरू केलेली वसुली तत्काळ थांबवली आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर येऊन निकराची लढाई करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना नेहमी कटिबद्ध आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्रस्तर व राज्यस्तरावर वारंवार वेगवेगळ्या भूमिका घेत असते. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करीत असल्याचा दिखावा करीत असले तरी त्यांची धोरणे शेतकरी हिताविरोधी आहेत.

ते म्हणाले की, एफआरपीनुसार उसाला दर, बाजारभावानुसर शेतीमालाला दर, शेतीसाठी नुकसानभरपाई, महापुरातील शेती पिकाची भरपाई आदीबाबत सरकार कोणतीच ठाम भूमिका घेत नाही. जे सरकार व नेते बांधिलकी तोडून स्वार्थाचे राजकारण करणार असतील, त्यांच्याशी स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणतेच संबंध ठेवणार नाही.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी