शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

पूरबाधित 74 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 15:33 IST

सांगली शहरासह जिल्ह्यातील 74 हजार 29 कुटुंबांना 30 ऑगस्ट अखेर एकूण 7402.9 क्विंटल गहू व 7402.9 क्विंटल तांदूळ मोफत वाटप करण्यात आले असून उर्वरीत पूरबाधितांना मोफत धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.

ठळक मुद्देपूरबाधित 74 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटपजिल्ह्यात 4 1कोटी 51 लाख 75 हजार सानुग्रह अनुदान वितरीत

सांगली : सांगली शहरासह जिल्ह्यातील 74 हजार 29 कुटुंबांना 30 ऑगस्ट अखेर एकूण 7402.9 क्विंटल गहू व 7402.9 क्विंटल तांदूळ मोफत वाटप करण्यात आले असून उर्वरीत पूरबाधितांना मोफत धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.

सांगली शहरासह जिल्ह्यातील पलूस, वाळवा, मिरज व शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने पुरामुळे सुमारे 104 गावे बाधित झाली. मदत व पुनर्वसनासाठी पूरपश्चात उपाययोजना अत्यंत गतीने सुरू आहेत.

तसेच एकूण 58 हजार 824 इतक्या बाधित कुटूबांना 5 लिटर प्रमाणे 2 लाख 94 हजार 120 लिटर केरोसीन वाटप करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली.जिल्ह्यात 4 1कोटी 51 लाख 75 हजार सानुग्रह अनुदान वितरीत पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार या प्रमाणे 83 हजार 35 कुटुंबाना 41 कोटी 51 लाख 75 हजार इतके सानुग्रह अनुदान रोखीने वाटप करण्यात आले आहे. तर 5 हजार रूपये वजा जाता उर्वरित 15 कोटी 79 लाख 60 हजार रूपयांची रक्कम धनादेशाव्दारे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.सांगली शहरासह जिल्ह्यातील 104 गावांना महापुराचा मोठ्याप्रमाणावर फटका बसला आहे. लोकांना तात्काळ मदत म्हणून सानुग्रह अनुदान शहरी भागात 15 हजार तर ग्रामीण भागात 10 हजार या प्रमाणे वितरित करण्यात येत आहे. यातील 5 हजार रुपये रोखीने तर उर्वरित रक्कम बँकेत धनादेशाद्वारे जमा करण्यात येत आहे.जिल्ह्यात 30 ऑगस्ट अखेर ग्रामीण भागातील 45 हजार 195 कुटूंबे व शहरी भागातील 42 हजार 646 कुटूंबे बाधित झाली होती. त्यापैकी ग्रामीण भागातील 43 हजार 490 व शहरी भागातील 39 हजार 545 कुटूंबांना 5 हजार रूपये या प्रमाणे रोखीने रक्कम वितरीत करण्यात आली आहे. तर ग्रामीण भागातील 26 हजार 262 व शहरी भागातील 2 हजार 665 अशा एकूण 28 हजार 927 अनुदान 15 कोटी 79 लाख 60 इतके अनुदान बँकेत जमा करण्यात आले आहे.यामध्ये मिरज तालुक्यातील 20 पुरामुळे बाधीत झाले असून यातील ग्रामीण भागातील 13 हजार 624 तर शहरी भागाती 39 हजार 530 कुटुंबाना 26 कोटी 57 लाख 70 हजार रोखीने तर ग्रामीण भागातील 7 हजार 405 व शहरी भागातील 2 हजार 650 कुटुंबाना 6 कोटी 35 लाख 25 हजार रुपये बँकेत धनादेशाद्वारे जमा करण्यात आले आहेत.वाळवा इस्लामपूर तालुक्यातील 38 गावे पुरामुळे बाधित झाली आहेत. यामध्ये 12 हजार 842 कुटुंबाना 6 कोटी 42 लाख 10 रुपये रोखीने तर 9 हजार 579 कुटुंबाना 4 कोटी 78 लाख 95 हजार धनादेशाद्वारे वाटप करण्यात आले आहे.शिराळा तालुक्यातील 21 गावे पुरामुळे बाधित असून 613 कुटुंबाना 30 लाख 65 रोखीने तर 612 कुटुंबाना 30 लाख 60 हजार इतकी रक्कम बँकेत धनादेशाद्वारे जमा करण्यात आले आहे.पलूस तालुक्यातील 25 गावे पुरामुळे बाधित असून 16 हजार 411 ग्रामीण तर 15 शहरी कुटुंबांना 8 कोटी 21 लाख 30 हजार रोखीने आणि 8 हजार 666 ग्रामीण व 15 शहरी कुटुंबाना 4 कोटी 34 लाख 80 हजार इतकी रक्कम धनादेशाद्वारे वितरित करण्यात आली आहे. 

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरcollectorजिल्हाधिकारी