शहरं
Join us  
Trending Stories
1
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
2
"माझ्या करिअरचं फार वाटोळ केलं", पंकजा मुंडेंनी हात जोडून हसतच दिलं उत्तर
3
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
4
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
5
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
6
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
7
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
8
Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
10
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
11
टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?
12
गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...
13
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
14
VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी
15
टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान
16
"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."
17
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
18
“राज्यात बहि‍णींना सुरक्षेची गरज, वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार”: नाना पटोले
19
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
20
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!

ई-पाससाठी माल वाहतूकदारांचा पोलिसांकडून छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:27 AM

सांगलीत रविवारी विश्रामबाग पोलिसांनी ट्रकचालकाला ई-पास नसल्याचे सांगत ५०० रुपये दंड ठोठावला. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : माल वाहतुकीसाठी ...

सांगलीत रविवारी विश्रामबाग पोलिसांनी ट्रकचालकाला ई-पास नसल्याचे सांगत ५०० रुपये दंड ठोठावला.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : माल वाहतुकीसाठी ई-पास गरजेचा नसल्याचे शासनाने स्पष्ट केले असतानाही पोलिसांकडून अडवणूक सुरु आहे. ट्रक चालकांकडून ५०० ते १००० रुपयाच्या पावत्या फाडल्या जात आहेत.

लॉकडाऊन काळात वाहतूक मंदावल्याने अन्न-धान्याच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती

आभाळाला भिडत आहेत. यावर नियंत्रणासाठी शासनाने माल वाहतुकीला मोकळीक दिला आहे. सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही या वाहनांना ई-पास गरजेचा नसल्याचे स्पष्ट केले आहे. अगदी देशभरात कोठेही वाहतूक करता येते. सांगली पोलिसांना मात्र या आदेशांची माहिती नसावी असे दिसत आहे.

रविवारी (दि. २३) मुंबईहून सांगलीला माल घेऊन आलेल्या ट्रकचालकाला (एमएच १०, सीएल २८७२) विश्रामबाग पोलिसांनी अडवून धरले. मिरजेला व्यापाऱ्याच्या गोदामाकडे माल घेऊन जात असताना सांगलीत बाजार समितीसमोर ट्रक अडवला. ई-पास नसल्याबद्दल दमबाजी केली. माल वाहतुकीसाठी त्याची गरज नसल्याचा खुलासा चालक नौशाद पिरजादे यांनी केला, परंतु पोलीस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

पिरजादे यांनी संबंधित व्यापाऱ्याला फोन लावला, पण तोदेखील पोलिसांनी घेतला नाही. ५०० रुपयांची पावती करण्यास भाग पाडले. ती केल्यानंतरच ट्रक सोडला. पावतीवर कोरोनाचा उल्लेख केला, पण कोणत्या नियमाचा भंग केला याचा उल्लेख मात्र टाळला. पावत्यांचे टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार वाहतूकदारांनी केली आहे.

कोट

वाहनचालकांची पोलीस अडवणूक करत असल्याच्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. माल वाहतुकीसाठी कोणत्याही प्रकारच्या ई-पासची गरज नसल्याचे शासनाने व सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पोलिसांनी अडवल्यास वाहनचालकांनी वाहतूकदार संघटनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.

- बाळासाहेब कलशेट्टी, अध्यक्ष, सांगली जिल्हा माल वाहतूकदार संघटना