शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
3
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
4
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
5
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
6
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
7
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
8
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
9
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
10
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
11
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
12
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
13
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
14
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
15
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
16
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
17
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
18
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
19
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
20
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी

शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सरकारला पाडण्यासाठी सज्ज व्हा, प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 11:33 AM

सांगलीत सत्ता संपादन निर्धार मेळाव्यात केंद्र सरकारवर टीका, पोलिसांनाही दिले आव्हान 

सांगली : अत्यावश्यक शेतीमालाचे भाव वाढवून अल्पकाळात सामान्य नागरिकांना लुटायचे अन् पुन्हा भाव पाडून शेतकऱ्यांचेही नुकसान करायचे, असा नवा फंडा केंद्र सरकारने राबविण्यास सुरूवात केली आहे. व्यापारी व सरकार यांच्या संगनमताने या गोष्टी घडताहेत. शेतकऱ्यांना व सामान्य नागरिकांना लुटणाऱ्या या सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी केले.सांगलीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर बुधवारी वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन निर्धार सभा पार पडली. यावेळी पक्षाचे नेते जयसिंग शेंडगे, सोमनाथ साळुंखे, डॉ. क्रांती सावंत, इम्तियाज सादिक, दिशा पिंकी शेख आदी उपस्थित होते.आंबेडकर म्हणाले की, देशात सध्या लोकांच्या नकळत पैसे लुटले जात आहेत. शेतीमालाच्या माध्यमातून लुटीचा नवा फंडा या सरकारने शोधून निवडणूक फंड म्हणून त्याचा वापर सुरू केला आहे. काही महिन्यांपूर्वी टॉमेटोचे भाव पडले म्हणून शेतकऱ्यांनी ते कवडीमोल दरात विकून टाकले. त्यानंतर दीडच महिन्यात प्रतिकिलो १४० रुपयांपर्यंत हे दर वाढले. त्यानंतर काही महिन्यातच पुन्हा दर पाडण्यात आले. भाववाढीच्या काळात ३५ हजार कोटींची लूट या देशात झाली. हा पैसा निवडणुकीसाठी वापरला गेला. यावर प्रतिवाद करायचा असेल तर मी कोणत्याही व्यासपीठावर येण्यास तयार आहे, असे आव्हान आंबेडकर यांनी दिले.ते म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारने दहा वर्षांचा सत्ताकाळ लोकांच्या कल्याणासाठी नव्हे तर लुटण्यासाठी कारणी लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:च्याच प्रेमात पडले आहेत. त्यामुळे त्यांना कशाचेही भान नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची प्रतिमा कशी आहे, याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे.

मोदींच्या काळात १४ लाख हिंदू कुटुंबांचे स्थलांतरआंबेडकर म्हणाले की, भारतात १९५० ते २०१४ या ६४ वर्षांच्या काळात ७ हजार ६४४ भारतीय कुटुंबांनी देश सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारले. स्वत:ला हिंदू रक्षणकर्ते समजणाऱ्या मोदी सरकारच्या २०१४ ते २०२३ या कालावधीत १४ लाख भारतीय कुटुंबांनी देश सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारले. ईडीची भीती दाखवून आपली संपत्ती व इभ्रत लुटली जाईल, याची भीती या कुटुंबांमध्ये होती. त्यामुळे त्यांनी स्थलांतर केले.सभा बरसला पाऊसप्रकाश आंबेडकर यांचे भाषण सुरू असताना पावसाला सुरुवात झाली. तुरळक पावसात भिजतच ते बोलत होते. पावसाचा जोर वाढल्यानंतर त्यांना भाषण आटोपते घ्यावे लागले. सभा संपल्यानंतर अल्पावधीतच क्रीडांगणावर मुसळधार पावसामुळे दलदल निर्माण झाली.पोलिसांनी गुन्हा दाखल करावाचव्यासपीठावर अनेक महापुरुषांच्या प्रतिमांसह आंबेडकरांनी टिपू सुलतान यांच्या प्रतिमेसही पुष्पहार अर्पण केला. टिपू सुलतान जयंतीबाबत मज्जाव करणाऱ्या पोलिसांनी हिंमत असेल तर कारवाई करून दाखवावीच, असे आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी दिले.

टॅग्स :SangliसांगलीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरCentral Governmentकेंद्र सरकार