शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राजकीय तंटामुक्तीसाठी हवेत दोन उपसरपंच, सांगलीतील आरळ्याच्या सामाजिक कार्यकर्त्या मुल्ला यांची मागणी

By अशोक डोंबाळे | Updated: July 15, 2023 12:12 IST

सदस्यांची फोडाफोडी व काहीवेळा पळवापळवी होते यामध्ये आर्थिक गैरव्यवहार होतो. गावपातळीवर मोठा तणाव निर्माण होऊन वाद विकोपाला जातो

सांगली : महाराष्ट्रात सरकारने दोन उपमुख्यमंत्री निवडले असून, गावातही दोन उपसरपंच निवडायचे आहेत. कारण गाव पातळीवर राजकीय गट-तट आहेत. वाद मिटवण्यासाठी दोन उपसरपंच निवडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी आरळा (ता. शिराळा) येथील सामाजिक कार्यकर्त्या हसिना रमजान मुल्ला यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हा परिषदेला पाठवले आहे.निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागातील प्रत्येक गावा-गावात अनेक गट असतात, त्यातून अनेकजण ग्रामपंचायत सदस्य म्हणून वेगवेगळ्या पॅनलमधून निवडून आले आहेत. सदस्य झाल्यानंतर प्रत्येकालाच सरपंच किंवा उपसरपंच पद मिळण्याची अपेक्षा असते. सरपंचपद राखीव असेल तर सर्वसाधारण गटाला संधी मिळत नाही. त्यातून अनेकजण नाराज होतात, सदस्यांची फोडाफोडी व काहीवेळा पळवापळवी होते यामध्ये आर्थिक गैरव्यवहार होतो. गावपातळीवर मोठा तणाव निर्माण होऊन वाद विकोपाला जातो.दोन गटात भांडणे होतात व त्याचा दुष्परिणाम गावच्या विकासावर होतो. राजकीय वातावरण दूषित होते. त्यामुळे शासनाने दोन उपमुख्यमंत्र्यांप्रमाणे दोन उपसरपंच निवडण्याची तरतूद करण्याची गरज आहे. अनेक ग्रामपंचायत सदस्यांना पाच वर्षांच्या कालावधीत उपसरपंच होण्याची संधी मिळेल व सर्वांना मर्जीप्रमाणे ग्रामविकासात योगदान देता येईल.जिल्हा परिषदेने निवेदन पाठविले शासनाकडेआरळ्याच्या सामाजिक कार्यकर्त्या हसिना मुल्ला यांनी दिलेल्या निवेदनाची जिल्हा परिषदेत चांगलीच चर्चा रंगली होती. प्रशासनानेही निवेदन तत्काळ शासनाकडे पाठविले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायत