शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

राजेवाडी तलावात जीये कटापूर किंवा उरमोडीचे पाणी द्या, सांगलीतील भाजप नेत्यांची फडणवीसांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 12:58 PM

नदीकाठच्या परिसरातील गावांना याचा फायदा होणार

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील राजेवाडी तलावामध्ये जीये कटापूर किंवा उरमोडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. लवकरच याबाबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावणार असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.राजेवाडी तलावामध्ये जीए कटापूर किंवा उरमोडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याबाबत खासदार संजयकाका पाटील, आमदार गोपीचंद पडळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत संबंधितांना आदेश देण्याबाबत मागणी केली आहे.कोरेगाव व माण-खटावच्या मागणीनंतर शिल्लक राहिलेले ०.७५ टीएमसी पाणी राजेवाडी तलावात सोडून दरवर्षी तलाव भरण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. याबाबत लवकरच वरिष्ठ स्तरावर बैठक होणार असून, यामुळे माणगंगा नदी बारमाही प्रवाहित होण्यास मदत मिळणार आहे. याचा फायदा नदीकाठच्या परिसरातील गावांना होणार आहे.यावेळी हर्षवर्धन देशमुख, जयवंतराव सरगर, अनिल पाटील, यल्लाप्पा पवार, प्रणव गुरव, हरिशेठ गायकवाड, अनिल सूर्यवंशी उपस्थित होते.

एमआयडीसीसाठी लवकरच बैठकाआमदार पडळकर म्हणाले की, पाणी दाखल्यासाठी रखडलेले काम आता मार्गी लागले असून, कामथ किंवा जांभुळणी तलावातून एमआयडीसीच्या पाण्याची समस्या सुटणार आहे. शेतकऱ्यांनी जमीन देऊ केली असून, ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्राचा विषयही मार्गी लागला आहे. कामथ येथे एमआयडीसीसाठी ३५० एकर शेतजमिनीचा प्रश्न मार्गी लागत आहे. एमआयडीसीमुळे जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना तीन किंवा साडेपाच पट भरपाई मिळणार आहे. तसेच एमआयडीसीत त्यांना बिगर शेतीचे प्लॉटही मिळतात. याबाबत लवकरच मुंबईत बैठक होणार आहे.

वन पर्यटन क्षेत्र विकसित करणारआटपाडी येथे तलाव परिसरात फुलपाखरांची बाग करण्याचा नवीन प्रस्ताव सुचविण्यात आला आहे. तलावात बोटिंग सुविधा करण्याचा, तसेच त्या परिसरात वॉकिंग ट्रॅक, बगीचा यासारख्या सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाच कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे, अशी माहिती आमदार पडळकर यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस