शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

Raju Shetty: राजकारणापेक्षा चळवळीला महत्त्व देणार, लोकसभा निवडणुकीबाबत राजू शेट्टी म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2023 11:42 AM

पन्नास खोके याबद्दल शेट्टी यांना छेडले असता यावर त्यांनी मौन पाळले

अशोक पाटीलइस्लामपूर : विविध पक्षांशी घरोबा केल्यानेच शेतकरी चळवळ मागे पडली. आगामी काळात कोणत्याही पक्षाशी घरोबा करणार नाही. पुन्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ताकदीवरच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातूनच आपण निवडणूक लढविणार असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.शेट्टी म्हणाले, सत्तेसाठी आपण राजकारण करणार नाही. चळवळीच्या माध्यमातूनच पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बळ देण्याचे आमचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. काही ग्रामपंचायतींमध्ये स्वाभिमानी संघटनेचे सरपंच आणि सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना बळ आले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’ची भूमिका संघटनेची असणार आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विशेषत: सरपंच पदासाठी मोठ्या प्रमाणात मतांच्या घोडेबाजाराचा ट्रेंड आला आहे. यावर शेट्टी म्हणाले, आपण अशा ट्रेंडच्या पाठीमागे लागणार नाही. जन्मत: आमचे रक्त चळवळीचे आहे. चळवळीतून आपण मोठे झालो आहोत. आगामी काळात राजकारणापेक्षा चळवळीला महत्त्व देणार आहे. यासाठी राज्यातील कार्यकर्त्यांना बळ देणार आहोत. प्रत्येक भागातील स्वाभिमानीचा कार्यकर्ता सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच त्या-त्या भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका बजावून स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्ष करत आहे. त्यामुळे आता राजकारणापेक्षा चळवळच आम्हांला महत्त्वाची वाटत आहे.ते म्हणाले, आगामी काळात हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पक्षीय उमेदवारांची संख्या कितीही असो, आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेतूनच निवडणूक लढविणार आहोत. कोणत्याही पक्षाशी घरोबा करणार नाही.एक व्होट एक नोटपन्नास खोके याबद्दल शेट्टी यांना छेडले असता यावर त्यांनी मौन पाळले. परंतु आगामी लोकसभेला मात्र एक व्होट एक नोट हा स्वाभिमानीचा नारा घेऊनच निवडणुकीत उतरणार. मतदार, शेतकरी राजा याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतील, असाही विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टी