शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
2
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
3
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
4
Zerodha नं गुंतवणूकदारांना दिली आनंदाची बातमी, ब्रोकरेज चार्जवर केली मोठी घोषणा
5
“गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला १५०० रुपये मिळाले असते का?”: शहाजीबापू पाटील
6
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? काही क्षणात तुम्हाला करतात कंगाल!
7
महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु
8
दुधाचा चहा ठरू शकतो 'या' जीवघेण्या आजारांसाठी कारणीभूत?; ICMR चा धक्कादायक रिपोर्ट
9
धक्कादायक! शाळेच्या बसने अचानक घेतला पेट; 25 विद्यार्थी-शिक्षकांचा होरपळून मृत्यू
10
"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला", मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दावा 
11
Loan घेण्यासाठी महत्त्वाचा असतो CIBIL Score आणि Credit Score; तुम्हाला दोघांतला फरक माहितीये का?
12
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले
13
मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला ५० वर्षांहून अधिक काळ अबाधित असणारा गावसकरांचा विक्रम
14
शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?
15
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
16
"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा
17
"सिडकोच्या धरणात महायुतीचा १४०० कोटींचा घोटाळा; 'मेघा इंजिनिअरिंग' महालाभार्थी"; काँग्रेसचा आरोप
18
आत्मसंरक्षणासाठी बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटीकडे आहे शस्त्र परवाना, बाळगतात बंदूक
19
PKL 2024 : संघानं खूप 'भाव' दिला, आता करुन दाखवायचंय; यू मुंबाचा कर्णधार म्हणतो 'है तय्यार हम'
20
बापरे! ५८ किलो चांदी घेऊन नोकर फरार, मालकाला कल्पनाच नाही; पोलिसांनी केला पर्दाफाश

जागतिकीकरणामुळे माणसापेक्षा पैशाचे मूल्य वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 11:42 PM

कुंडल : जागतिकीकरणामुळे माणसाचे मूल्य कमी होऊन पैशाचे मूल्य वाढले आहे. यामुळे फायदे होण्यापेक्षा तोटेच होत आहेत, असे प्रतिपादन ...

कुंडल : जागतिकीकरणामुळे माणसाचे मूल्य कमी होऊन पैशाचे मूल्य वाढले आहे. यामुळे फायदे होण्यापेक्षा तोटेच होत आहेत, असे प्रतिपादन ९१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. कुंडल (ता. पलूस) येथे क्रांतिअग्रणी पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.ज्येष्ठ महिला विचारवंत डॉ. पुष्पा भावे यांचा यावेळी ‘क्रांतिअग्रणी पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. लक्ष्मीकांत देशमुख यांच्याहस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, आजवर अनेक मोर्चे निघाले, तरीही शासन त्यावर कायमस्वरूपी उत्तर शोधत नाही. शासकीय योजना कागदोपत्री चांगल्या आहेत; परंतु त्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाहीत. राजकीय पक्ष धर्म आणि जातीच्या नावाने समाजाला झुंजवत आहेत, त्यामुळे समाजात विषमता निर्माण होत आहे. यामध्ये तरुण पिढी भरडली जात आहे. यांत्रिकीकरणामुळे बेकारी वाढत आहे. ही बेकारी जागतिकीकरणाचाच एक भाग आहे. त्यामुळे राजकीय लोकशाहीपेक्षा सामाजिक लोकशाही असणे आवश्यक आहे. आर्थिक लोकशाही असेल तर, आर्थिक विषमता दूर होईल. आर्थिक लोकशाहीमध्ये देश कमी पडल्यामुळे आज मोर्चे निघत आहेत. शेतकऱ्यांची आत्महत्या ही याच आर्थिक लोकशाही न मिळाल्याचा परिणाम आहे, असे सांगून त्यांनी कृष्णाकाठी अनेक महान व्यक्ती घडल्या, त्यातीलच जी. डी. बापू एक आहेत. अकुशल कामगारांना न्याय देण्यास जी. डी. बापू यांनी दिलेला लढा श्रेष्ठ होता, असे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी क्रांतिअग्रणी पुरस्काराची भूमिका मांडताना क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुण लाड म्हणाले, या व्याख्यानमालेमुळे लोकप्रबोधनाचा जागर सुरू केला. यातून क्रांतिअग्रणी जी. डी. बापूंना अपेक्षित असा समाज घडेल, अशी अपेक्षा आहे. जी. डी. बापू यांची सामाजिक चळवळ सुरू ठेवणारे आणि भौतिक गोष्टींचा त्याग करणाºया व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो, असे त्यांनी सांगितले.यावेळी क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, उद्योजक उदय लाड, प्रकाश लाड, दिलीप लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, सचिन कदम, सुभाष पवार, दिलीप देशमुख, वासंती मेरू, भास्कर सावंत, प्राचार्य पी. आर. पवार, प्रा. बाबूराव गुरव, जे. बी. पाटील, नथुराम पवार, पी. पी. कुंभार, प्रा. के. एम. नलावडे, राजेंद्र लाड, रणजित लाड, सरपंच प्रमिला पुजारी, संजय संकपाळ, नंदाताई पाटील, आनंदराव जाधव, कुमार शिंदे, सुभाष पवार उपस्थित होते.डॉ. प्रताप लाड यांनी मानपत्र वाचन केले, श्रीकांत लाड यांनी स्वागत व प्रास्ताविक, तर श्रीकांत माने यांनी सूत्रसंचालन केले. नवनाथ गुंड यांनी आभार मानले.सरकारच्या प्रत्येक निर्णयावर प्रश्नचिन्ह : भावेसत्काराला उत्तर देताना डॉ. पुष्पा भावे म्हणाल्या, शासनाच्या प्रत्येक निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मराठा आरक्षण मिळाले; परंतु त्याच्या भविष्याविषयी आजही प्रश्नचिन्ह आहे. शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत आहे. असे अनेक प्रश्न आज सर्वत्र भेडसावत आहेत. यासाठी जनतेतून उद्रेक होणे आवश्यक आहे आणि हा उद्रेक इतरांपासून होण्याची वाट न बघता तो स्वत:पासून करावा. प्रत्येकाने फक्त स्वत:चा विचार न करता समाजासाठी आपण काही तरी देणे लागतो, अशी भूमिका ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले.