शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

साखरसम्राटांना सदाभाऊंची चपराक

By admin | Published: March 21, 2017 11:43 PM

वाघवाडी कृषी महाविद्यालयास नाव : क्रांतिसिंह नाना पाटील यांचा सन्मान

अशोक पाटील ल्ल इस्लामपूर वाळवा तालुक्यातील राजारामबापू पाटील यांनी निर्माण केलेल्या सर्वच सहकारी संस्थांना त्यांच्या राजकीय वारसदारांनी बापूंचे नाव दिले आहे. याउलट सर्वसामान्य शेतकरी आणि ऊस उत्पादकांच्या ताकदीवर मंत्री झालेल्या सदाभाऊ खोत यांनी वाघवाडी येथे होणाऱ्या कृषी महाविद्यालयाला क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नाव देऊन साखरसम्राटांना चपराक दिली आहे.महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील साखरसम्राटांनी ऊस उत्पादकांच्या जिवावर राजकीय बस्तान बसवले आहे. त्यांनी साखर उद्योगाच्या साहाय्याने शैक्षणिक, वित्तीय आणि सहकारी संस्था निर्माण केल्या. मात्र या संस्थांना घरातील नेत्यांचेच नाव देण्याचा फंडा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. अलीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या सर्वच सहकारी साखर कारखान्यांची नावे बदलण्याचा फंडा सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे. कारखान्याची सत्ता बदलली की कारखान्याचे नाव बदलण्याचे राजकारणही खेळले जात आहे. वाळवा तालुक्यातील राजारामबापू उद्योग समूहात हेच दिसते. राजारामबापू पाटील यांनी आपल्या कारकीर्दीत वाळवा सहकारी साखर कारखाना, वाळवा सहकारी बँक, वाळवा सहकारी दूध संघाची स्थापना केली होती. कालांतराने सर्वच संस्थांचा विस्तार वाढत गेला. राजारामबापूंच्या पश्चात त्यांचे पुत्र आमदार जयंत पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी प्रत्येक संस्थेला राजारामबापूंचे नाव देण्याचा सपाटा लावला आहे. यावर अनेकांनी आक्षेप घेतले तरीही, सत्तेच्या जोरावर त्यांनी सर्व विरोध धुडकावून लावत हवे तेच केले.इस्लामपूर नगरपालिकेच्या माध्यमातून झालेल्या इमारती, प्रकल्प, संकुलांना राजारामबापूंचेच नाव देण्यात आले आहे. नाट्यगृह नामकरणावेळी तर गदारोळ झाला. शिवसेनेने एका रात्रीत डिजिटल फलक लावून नाट्यगृहाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले होते. परंतु सत्ताधाऱ्यांनी अखेर नाट्यगृहाला राजारामबापूंचेच नाव दिले. पंचायत समितीच्या नूतन इमारत बांधकामानंतर येथील वसंतदादा सभागृहाचे नाव बदलून राजारामबापूंचे नाव देण्यात आले. याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. परंतु येथे जयंत पाटील यांचाच विजय झाला. शासनाकडूनही राजारामबापूंचे नाव ठेवण्याचा निर्णय कायम झाला.क्रांतिसिंहांच्या विचारावर श्रध्दा आता राज्यातील साखरसम्राटांच्या मक्तेदारीला विरोध आणि जयंत पाटील यांना चपराक देण्यासाठीच वाघवाडी येथे होणाऱ्या शासकीय कृषी महाविद्यालयाला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नाव दिले आहे. सदाभाऊ यांची क्रांतिसिंहांच्या विचारांवर श्रद्धा आहे. या श्रद्धेची जपणूकच त्यांनी यातून केली आहे, अशी चर्चा सध्या वाळवा तालुक्यामध्ये सुरु झाली आहे.