शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
3
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
4
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
5
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
6
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
7
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
8
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
9
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
10
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
11
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
12
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
13
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
14
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
15
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
16
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
17
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
18
सेमीकंडक्टर उद्योग राखेल समतोल; जगातील सत्तांना उद्देशून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
19
ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष!
20
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले

कोरोनाबाबत शासनाने अधिक गंभीर व्हावे : फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 5:28 PM

कोरोनाबाबत शासनाने जेवढे गांभीर्य दाखवायला हवे तितके दिसत नाही. शासनाने योग्य नियोजन केले, तरच प्रशासन गतीने काम करते. त्यामुळे शासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देकोरोनाबाबत शासनाने अधिक गंभीर व्हावे : फडणवीस फडणवीस यांनी पत्रकारांशी साधला संवाद

सांगली : कोरोनाबाबत शासनाने जेवढे गांभीर्य दाखवायला हवे तितके दिसत नाही. शासनाने योग्य नियोजन केले, तरच प्रशासन गतीने काम करते. त्यामुळे शासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.ते म्हणाले की, राज्यात सर्वत्र कोरोनाचा आलेख वाढत आहे. परिस्थिती ंिचंताजनक आहे. अशा काळात योग्य नियोजन हवे. महापालिकांना याकामी विशेष निधी देणे, जिल्हा नियोजन समितीमार्फत तसेच अन्य योजनांमधून जिल्हानिहाय मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करणे गरजेचे आहे.

राज्यभरातील अनेक गोरगरीब रुग्णांना महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. रेमिडेसीवीर इंजेक्शनच्या सहा डोसची किंमत ३५ हजार रुपये आहे. खासगी रुग्णालयांमध्येही ते मोफत देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते.

प्रत्यक्षात आता प्रशासकीय स्तरावर तसेच रुग्णालयांना त्यांनी या औषधाचा डोस मोफत दिला जाणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना या औषधाची गरज आहे त्यांना ते मिळत नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSangliसांगलीBJPभाजपा