शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' राजकारण्यांना खडे बोल सुनावले पाहिजेत; राज ठाकरेंचं मराठी साहित्यिकांना आवाहन
2
Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी
3
हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतरावर फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, "तुम्ही नवीन काय..."
4
भारताची 'पूजा' पाकिस्तानच्या क्रिकेटपटूशी विवाह करणार; लग्नाआधी इस्लाम धर्म स्वीकारणार
5
आपच्या खासदारावर ईडीची छापेमारी; फायनान्सरही कचाट्यात
6
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
7
देवीचे दर्शन करून घराकडे निघालेले कोल्हापुरातील दोन भाविक अपघातात ठार, दोघे गंभीर जखमी
8
४१००० मृत्यू, मोठा विध्वंस, तरीही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही; १०१ इस्रायली अजूनही ओलीस
9
सणासुदीच्या काळात ₹10000 कोटी रुपयांची खरेदी करण्याच्या तयारीत गौतम अदानी? या बड्या कंपनीवर नजर?
10
"एक दिवस सगळं संपलं, शूटिंगवरुन घरी येते तेव्हा..."; अभिनेत्रीने आधी वडील गमावले मग आई
11
श्रीकांत शिंदेंचा विश्वासू शिलेदार उद्धव ठाकरेंकडे परतला; CM एकनाथ शिंदेंना धक्का
12
हृदयद्रावक! वडिलांबरोबर पोहायला गेलेला, नऊ वर्षांचा मुलगा पाण्यात बुडाला
13
"चिरंजीवाचे प्रताप वडिलांनी एकदा समजून घ्यावेत"; वर्षा बंगल्याचा उल्लेख करत राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा
14
गायक अदनान सामींना मातृशोक, ७७ व्या वर्षी आईने घेतला अखेरचा श्वास
15
कुछ तो गडबड है दया! शिवाजी साटम यांनी सांगितलं CID मालिका बंद होण्याचं कारण
16
रायबरेलीमध्ये मोठी दुर्घटना टळली; रुळावर मातीचा ढीग, लोको पायलटने ट्रेन थांबवली अन्...
17
लाखो लोक, ट्रॅफिक जॅम, रेल्वे स्टेशन फुल पॅक आणि...; मरिना बीचवरचे धडकी भरवणारे फोटो
18
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा यांची तब्येत बिघडली, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
19
बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेनंतर जिनिलिया देशमुखची पोस्ट, म्हणाली, "पुढच्या पर्वासाठी..."
20
Prajakta Mali : "तुझ्यातला प्रामाणिकपणा, जिद्द..."; प्राजक्ता माळीने केलं सूरज चव्हाणचं झापुक झुपूक अभिनंदन

सांगली जिल्ह्यात भाजपने जिंकल्या सर्वाधिक जागा, राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 1:03 PM

सांगली : जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ३१ ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळविले असून २७ ग्रामपंचायती मिळवून राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर राहिली ...

सांगली : जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ३१ ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळविले असून २७ ग्रामपंचायती मिळवून राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. काँग्रेस व माजीमंत्री अजितराव घोरपडे गटाने प्रत्येकी सात ग्रामपंचायती ताब्यात घेऊन ग्रामीण भागातील अस्तित्व कायम ठेवण्यात यश मिळविले. शिंदे गटाच्या शिवसेनेने सहा ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. तरमनसेने एक ग्रामपंचायत ताब्यात घेऊन ग्रामीण राजकारणात चंचू प्रवेश केला आहे.सांगली जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. यामध्ये १३ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध आणि ११ ग्रामपंचायतीचे पॅनेल बिनविरोध झाले आहे. पूर्णतः बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच वगळून उर्वरित ८३ ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान रविवारी झाले होते.

राष्ट्रवादीने शिराळा तालुक्यातील २९ पैकी सर्वाधिक १५ ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवून आमदार मानसिंगराव नाईक, माजीमंत्री शिवाजीराव नाईक आघाडी ग्रामीण मतदाराने स्वीकारल्याचा कौल आहे. वाळवा तालुक्यातील चारपैकी तीन ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यशस्वी ठरले. पण, कारंदवाडी या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मित्र पक्षांचे सहकार्य घेऊन भाजपने शिरकाव केला आहे. येथे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेतील माजी सदस्य संभाजी कचरे यांचा सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव झाला.आटपाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीपैकी नऊ ग्रामपंचायती आमदार गोपीचंद पडळकर व माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख गटाने जिंकल्या. शिवसेना चार आणि स्थानिक आघाड्यांनी चार ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले. येथे काँग्रेस, राष्ट्रवादीला खातेही उघडता आले नाही. जत तालुक्यातील सर्व पाचही ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यशस्वी ठरले. कवठेमहांकाळ तालुक्यातील २० पैकी आठ ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे ठेवण्यात आमदार सुमनताई पाटील यांना यश आले. तसेच सात ग्रामपंचायती खेचून आणण्यात माजी मंत्री अजितराव घोरपडे यशस्वी झाले आहेत.

कडेगाव तालुक्यातील तीन पैकी दोन ग्रामपंचायती काँग्रेसकडे ठेवण्यात माजीमंत्री विश्वजित कदम यांना यश आले आहे. एका ग्रामपंचायतीवर भाजपला समाधान मानावे लागले. पलूस तालुक्यातील चारपैकी काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. तासगावमध्ये दोन्ही ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व राखण्यात खासदार संजय पाटील यशस्वी झाले. खानापूर तालुक्यात दोन ग्रामपंचायती शिवसेनेचे आमदार अनिल बाबर गटाकडे तर दोन ग्रामपंचायती भाजप-राष्ट्रवादी आघाडीला मिळाल्या आहेत.

पक्षीय बलाबलपक्ष -ग्रामपंचायती संख्याभाजप -३१राष्ट्रवादी -२७काँग्रेस -०७घोरपडे गट -०७शिंदे गट शिवसेना -०६स्थानिक आघाड्या -१६

पालकमंत्र्यांना धक्कामिरज तालुक्यातील जानराववाडी आणि निलजी बामणी या ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविण्यासाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी आपले पॅनेल उभे केले. त्यासाठी खूप प्रयत्न करूनही त्यांच्या पॅनेलला अपयशाला सामोरे जावे लागले. भाजप आणि पालकमंत्री खाडे यांना मोठा धक्का आहे. या दोन्ही गावांमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजय झाले आहेत.

कारंदवाडीत जिप सदस्याचा पराभवकारंदवाडी (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सरपंचपदाचे उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संभाजी कचरे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा कचरे गट समर्थक आहे.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतResult Dayपरिणाम दिवसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस