शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

सांगली जिल्ह्यातील गायरानमधील ११४६८ बांधकामांवर पडणार हातोडा, मास्टर प्लॅन तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 12:29 PM

पहिल्या टप्प्यामध्ये गायरान जमिनीवर अतिक्रमणे हटविण्यासाठी संबंधितांना नोटिसा पाठविल्या आहेत

सांगली : जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील गायरान जमिनीवर ११ हजार ४६८ बांधकामे झाली असून, यावर हातोडा टाकण्यासाठी जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषदेकडून पूर्ण नियोजन झाले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये गायरान जमिनीवर अतिक्रमणे हटविण्यासाठी संबंधितांना नोटिसा पाठविल्या आहेत. यातूनही अतिक्रमणे हटविली नाही तर विशेष मोहीम राबवून अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत.सर्व शासकीय व गायरान जमिनीवर असलेल्या अतिक्रमणाबाबत कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठित केली असून, त्यात तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक, नगर परिषद, नगरपंचायत मुख्याधिकारी व उपअधीक्षक भूमी अभिलेख यांचा समावेश करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवून २७ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर असा कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला. त्यानुसार जिल्ह्यात गायरान जमिनीमध्ये ११ हजार ४६८ बांधकामे झाली आहेत. जवळपास १० हजार ५१ हेक्टर क्षेत्रावर बांधकामे झाले असून ही हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शासकीय ३९५.४७ हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणेही हटविण्यात येणार असून, जमिनी ताब्यात घेण्यात येणार आहेत.

३१ डिसेंबरपूर्वी अतिक्रमणे हटविणार : राजा दयानिधीसर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील शासकीय व गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ ची डेडलाइन दिली. यासाठी कालबद्ध नियोजन व आराखडा निश्चित केला. नेमकी जमीन अन् अतिक्रमणे किती याची अद्ययावत माहिती जिल्हा प्रशासनाने घेण्यास सुरुवात केली आहे. माहिती संकलन सुरू असून, त्यानंतरच अतिक्रमणे हटवण्याची कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

जिल्ह्यात अशी आहेत अतिक्रमणेतालुका           गायरान जमिनीतील बांधकामेमिरज                ३५३६तासगाव             २३८७क. महांकाळ       १५५०जत                  ५३३खानापूर             ४५४आटपाडी           २४७कडेगाव             १०९३पलूस                १८८वाळवा              १३६३शिराळा             १९७एकूण               ११४६८गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमितीकरण करा : उमेश देशमुखगायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमितीकरणासाठी १९९१ मध्ये कर्मवीवर दादासाहेब गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त तत्कालीन राज्य शासनाने नियमितीकरण केले होते. त्यानुसार सध्याची गायरान जमिनीवरील अतिक्रमणे शासनाने नियमितीकरण केली पाहिजेत. एकाही अतिक्रमणास प्रशासनाने हात लावू नये, अशी मागणी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांनी केली आहे.

टॅग्स :Sangliसांगली