शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

किलोला शंभर रुपये दिल्याशिवाय द्राक्षच विकणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 7:18 AM

पळशी (ता. खानापूर) येथील द्राक्ष बागायतदारांची गुरुवारी बैठक झाली. यावेळी माजी पं. स. सदस्य पांडुरंग जाधव, माजी ...

पळशी (ता. खानापूर) येथील द्राक्ष बागायतदारांची गुरुवारी बैठक झाली. यावेळी माजी पं. स. सदस्य पांडुरंग जाधव, माजी उपसरपंच संभाजी जाधव, माजी अध्यक्ष काकासो जाधव, अरविंद पाटील, रमेश जाधव, आदी उपस्थित होते.

यावेळी शेतकऱ्यांनी द्राक्षाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. चालू वर्षी किमान शंभर रुपये दर, तोही अगोदर ठरल्याशिवाय कोणीही द्राक्ष विकणार नाही, असा ठराव करण्यात आला. आपल्या मालाच्या दर्जानुसार दर ठरवावा, किमान दर शंभर ते सव्वाशे रुपये मिळाला पाहिजे. व्यापाऱ्यांनी द्राक्षाचे नमुने घेतानाच शेतकऱ्यांशी चर्चा करून दर ठरविणे गरजेचे आहे. दर निश्चित ठरल्याशिवाय कोणीही माल देऊ नये, मिळालेल्या दराबाबत एकमेकांना माहिती देऊन संवाद राखावा, द्राक्ष दर ठरविताना खर्चाचा विचार करावा, फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी, आदी ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

चौकट

निर्यातक्षम द्राक्ष बागायतदारांची दराबाबत उपेक्षा

पळशी येथे द्राक्ष बागा मोठ्या प्रमाणात आहेत. जवळजवळ सर्व द्राक्ष बागायतदार निर्यातक्षम द्राक्षशेती करतात. द्राक्षांचा दर्जा उच्च प्रतीचा असतो. मात्र, दर अपेक्षित मिळत नाही, दरवर्षी कोणाची ना कोणाची फसवणूक होते. द्राक्ष दराबाबत नेहमीच उपेक्षा राहिली आहे. अधिकारी आणि बाजार समित्यांकडून काहीच संरक्षण मिळत नाही. म्हणूनच शेतकऱ्यांनीच संघटित होण्याचा निर्णय घेतला आहे.