शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
6
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
7
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
8
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
10
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
11
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
12
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
13
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
14
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
15
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
16
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
17
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
18
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
19
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु

अरे, वीज देता का कुणी वीज..?

By admin | Published: January 18, 2016 11:20 PM

चार वर्षांपासून ग्राहक प्रतीक्षेत : जिल्ह्यात तेवीस हजार वीज जोडण्या रखडल्या--लोकमत विशेष

अशोक डोंबाळे -- सांगली विहीर आणि कूपनलिका खुदाईनंतर २०१२ पासून शेतकऱ्यांनी अनामत रक्कम भरून महावितरणकडे वीज जोडणीची मागणी केली आहे. परंतु चार वर्षात जिल्ह्यातील कृषिपंपांचे १३ हजार ५८४ आणि घरगुती, वाणिज्य व औद्योगिक वापराचे १० हजार ७६९ ग्राहक प्रतीक्षेत आहेत. वीज जोडणीसाठी ते महावितरणकडे फेऱ्या मारून थकले आहेत. वीज जोडणीच्या मूलभूत सुविधांसाठी दोनशे कोटींची गरज असून, निधी उपलब्ध नसल्यामुळे जोडणी प्रलंबित असल्याची जुजबी उत्तरे मिळत आहेत.सुमारे दोन हजारावर शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीकडून पाच ते वीस हजारांची अनामत रक्कम भरून २०१२ मध्ये वीज जोडणीची मागणी केली आहे. २०१३ मध्ये १७२६, तर २०१४ मध्ये २६४६ आणि २०१५-१६ मध्ये ७२६० शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज केले आहेत. मात्र वीज जोडणी अद्याप झालेली नाही. परिणामी त्यांच्या विहिरींचा वापर होत नसल्यामुळे त्या बुजू लागल्या आहेत. विहिरीत पाणी असूनही शेतकऱ्यांना पिके घेता आलेली नाहीत. कर्ज फिटण्याऐवजी विहीर खुदाईच्या कर्जाचा बोजा वाढला आहे. या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या संघटनाही गप्प आहेत. हीच परिस्थिती घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक वीज ग्राहकांची आहे. शासन म्हणते : ३१ मार्चपूर्वी सर्वांना कनेक्शन राज्य शासनाने एक परिपत्रक काढले असून, त्यामध्ये दि. ३१ मार्चपूर्वी सर्व २३ हजार ५८४ वीज ग्राहकांना वीज मिळाली पाहिजे, असे म्हटले आहे. प्रत्यक्षात वीज जोडणीसाठी निधी नाही. शासनाने आता निधी दिला तरीही त्या कामाची निविदा काढून ठेकेदार निश्चित करण्यासाठीच किमान दीड महिना लागणार आहे. अद्याप शासनाकडून निधीच उपलब्ध नसेल, तर ३१ मार्च २०१६ पूर्वी सर्व ग्राहकांची वीज जोडणी कशी होणार?, असा प्रश्न आहे.निधी नव्हे, केवळ आश्वासनजिल्ह्यातील साडेतेवीस हजार वीज ग्राहकांची वीज जोडणी प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वीच्या ऊर्जामंत्र्यांनी निधी देण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात निधी उपलब्ध झालाच नाही. ग्राहकांनी आमदार अनिल बाबर यांच्याकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊन बाबर यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर मुंबईत महावितरणच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घडवून आणली. त्यावेळी ऊर्जामंत्र्यांनी, दोनशे कोटी मंजूर केले असून, तातडीने शंभर कोटी खर्चाचा प्रस्ताव देण्याची अधिकाऱ्यांना सूचना दिली. महिन्यात निधी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र महिना संपला तरी शासनाकडून एक रुपयाही मिळालेला नाही.वारंवार मागणी करूनही निधी नाही घरगुती, वाणिज्य, औद्योगिक १० हजार ७६९ वीज ग्राहकांना वीज जोडणी मिळालेली नाही. ग्राहकांना वीज जोडणी देण्यासाठी खांब, तारा आणि रोहित्रे आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोनशे कोटींच्या निधीची गरज आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शासनाकडे वारंवार मागणी करूनही तो उपलब्ध झाला नाही. त्यामुळे वीज जोडणी प्रलंबित असल्याचे अधिकारी सांगत आहेत.