शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

Sangli: पाणी देणार नसाल, तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या; कवठेमहांकाळचे शेतकरी आक्रमक

By संतोष भिसे | Published: April 19, 2024 6:11 PM

अग्रणी नदी बारमाही झाल्यास गावे दुष्काळमुक्त होतील

महेश देसाईकवठेमहांकाळ : पाणी देणार नसाल, तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या अशी मागणी कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. म्हैसाळ व टेंभू सिंचन योजनेचे पाणी अग्रणी नदीत सोडावे यासाठी ते आक्रमक झाले आहेत. सिंचन योजनांचे कालवे सध्या तुडुंब भरून वाहत आहेत. तालुक्याची जीवन वाहिनी असलेली अग्रणी नदी मात्र कोरडीठाक पडली आहे. घाटमाथ्यावर टेंभू सिंचन योजना वाहत असून गावे कोरडी पडली आहेत. योजना असूनही गावांना फायदा नाही, त्यामुळे अग्रणीकाठचे तहानलेले शेतकरी अग्रणी नदीत आंदोलन करताना दिसत आहेत.अग्रणी नदी खोऱ्यात मळणगाव, शिरढोण, मोरगाव, विठुरायाचीवाडी, हिंगणगाव, अग्रण धुळगाव, लोणारवाडी अशी गावे आहेत. अग्रणी नदी बारमाही झाल्यास गावे दुष्काळमुक्त होतील. त्याचबरोबर हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येईल. फळशेती, फुलशेतीबरोबर भाजीपाल्याचा शेती व्यवसाय हायटेक बनवत आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. पण पाणी सोडण्याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप तेथील शेतकरी करताना दिसत आहेत.

पाटबंधारे विभागाला अग्रणी नदीमध्ये पाणी सोडण्याची मागणी केली; परंतु ते दुर्लक्ष करत आहेत. काही दिवसांत पाणी अग्रणीला नाही सोडले, तर आंदोलन करणार आहोत. -प्रिया सावळे, सरपंच, हिंगणगाव 

म्हैसाळ योजनेच्या पाण्याने धुळगावमधील बंधारे भरून मिळावेत यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले. पण दखल न घेतल्यामुळे आम्ही सर्व सदस्य व ग्रामस्थांना अग्रणी नदीमध्ये उपोषण करावे लागले. पुन्हा आंदोलनाची वेळ येऊ नये. - शिवदास भोसले, सरपंच, अग्रण धूळगाव

लोणारवाडी गावाने दुष्काळाच्या झळा खूप सोसल्या आहेत. शासनाने अग्रणी नदीला पाणी सोडावे, अन्यथा आम्हाला कर्नाटक राज्यात सामील होण्यासाठी परवानगी द्यावी. -अजित खोत, सरपंच, लोणारवाडी

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरीKarnatakकर्नाटक